HW News Marathi
मुंबई

भीमा-कोरेगाव घटनेचे पुरावे देणार: आंबेडकर

कोरेगाव भीमा येथील दगडफेकीमागे कुणाचे डोके आहे. याचा शोध घेऊन पुरावे देऊ असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणानंतर राज्यातील बहुजन समाजात सरकारविषयी सापत्न भावाची भावना निर्माण झाली आहे. सरकारने बहुजन समाजाच्या भावना लक्षात घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रकाश मेहता यांनी राजीनमा द्यावा-मलिक

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा लढा यशस्वी, कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार किमान ७००० रुपयांची वाढ

News Desk

अंधश्रद्धा वाढवणाऱ्या जाहिरातीला सरकारचं प्रोत्साहन ?

News Desk
महाराष्ट्र

10 जानेवारी रोजी “महाराष्ट्र बंद” नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. – मराठा क्रांती मोर्चा

News Desk

मुंबई. मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चा तर्फे कुठलाही बंद नाही. १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत एक मराठा भावाला आपला जीव गमवावा लागला तसेच २ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये अनेक ठिकाणी खाजगी मालमत्तेचे नुकसान केले गेले आहे व काही ठिकाणी मराठा बांधवांवर जाणीवपूर्वक ऍट्रॉसिटी सह इतर हि कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत यांच्या निषेधार्त काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले असून “महाराष्ट्र बंद” बाबत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि असा कुठलाही बंद ठेवला जाणार नाही. अशी माहित मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिली आहे.

पोखरकर म्हणाले की, मराठा समाजाच्या वतीने 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद अशा आशयाची एक पोस्ट मागील काही दिवसांपासून पासून सोशल मिडियावर धुमाकूळ घालीत आहे या संदर्भात मराठा क्रांति मोर्चा कडून असा कोणताही बंद नाही सदर पोस्टच्या माध्यमातून मराठा क्रांति मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे की, 10 जानेवारी ला कोणताही बंद नाही अफवावर विश्वास ठेवु नये मराठा क्रांति मोर्चा आणि सकल मराठा समाज हे समाजाचे व्यासपीठ आहे. ना कोणत्या पक्षाचे, ना कोणत्या संघटनेचे सकल मराठा समाज मराठा क्रांति मोर्चाची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही आणि कोणीही मराठा सामाजाच्या नावावर मराठा क्रांति मोर्चा किंवा सकल मराठा समाजाने बंद पुकारलेला नाही. मराठा समाजातील तरूणांचा वापर करून राजकारण करून मराठा-दलित वाद लावू पाहणाऱ्यांच्या कटकारस्थानाला कोणीही बळी पडू नये.

मराठा समाजाला या दंगलीत उतरवून मराठ्यांनाच टार्गेट करून जातीय तेढ निर्माण करून मराठ्यांची चळवळ मोडीत काढुन मराठ्यांचे लक्ष दूसरी कडे फिरवण्याचा प्रयत्न हानून पाडावा. मराठा समाजाला आपल्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेच आहे. दंगली पेक्षा आमच्या मुलांना आरक्षण, संरक्षण, शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय या कडे लक्ष देणे गरजेच आहे तसेच कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आलेले आहे. मराठा क्रांति मोर्चा व सकल मराठा समाजाचे नाव वापरून कोणी खोटे पोस्ट टाकत असेल या वर सर्व ग्रुप वर मैसेज टाकणाऱ्याला फोन करून जाब विचारावा असे पुढे म्हटले आहे. मराठा क्रांति मोर्चा आणि सकल मराठा क्रांति मोर्चाचे नाव घेऊन कोणत्याही पक्ष संघटनेने दिशाभूल करू नये. अन्यथा अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असा इशारा मराठा क्रांति मोर्चा कडून देण्यात आलेला आहे.

Related posts

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय जारी

Manasi Devkar

उमेदवारांच्या खर्चाची तपासणी प्राप्तिकर आणि विक्रीकर अधिकारी तपासणार

News Desk

मी 5 वर्ष खातं सांभाळलंय, मला शिकवू नका, मराठा तरुणांच्या नियुक्तीचे आदेश काढा!

News Desk