HW News Marathi
मुंबई

भाजपचे धारावीत खड्डे भरो आंदोलन

मुंबई | भारतीय जनता पार्टीच्या मुंबई सचिव दिव्या ढोले यांच्या नेतृत्वाखाली आज धारावीतील प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचा (भरण्याचा) कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. खड्डे भरण्याची सुरुवात साहिल हॉटेल , संत रोहिदास मार्ग , ९० फिट रोड , येथे करण्यात आली होती . पावसामुळे धारावीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांकडे धारावीतील जनतेने शिवसेनेच्या ४ , काँग्रेसच्या २ , व राष्ट्रवादी कॉग्रेस चा १ असे ७ नगरसेवक , 1 काँग्रेस आमदार , १ शिवसेना खासदार निवडून दिलेला आहे.

परंतु धारावीतील मूलभूत नागरी सोयी सुविधांकडे या लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे . भाजपा ला जनता महत्वाची आहे. सर्व सामान्य नागरिक , आबालवृद्ध , गरोदर स्रिया , शालेय विद्यार्थी यांना जनतेला रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना , चालताना रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यांनी मनकेदुखी , पाठदुखी असे विविध प्रकारचे आजार उदभवत आहेत . त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज खड्डे भरो आंदोलन केले.

भारतीय जनता पार्टीच्या खड्डे भरो आंदोलनाची प्रेरणा घेऊन मुंबई महानगर पालिकेचे संबंधित अधिकारी व स्थानिक नगरसेवक , नगरसेविका , आमदार , खासदार आदी लोकप्रतिनिधी आम्हाला खड्डे भरताना बघून तरी जागृत होऊन जनतेच्या सोयी, सुविधा आणि सुरक्षा ह्या कडे लक्ष देतील अशी अपेक्षा यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपाच्या मुंबई सचिव दिव्या ढोले,रिजवान पटेल, नेहाल वारीस,जुबेर शेख,भरत शर्मा,संजय गुप्ता,रमेश कुलुर,हासमुखवाला,आरती भोसले,योगिता पांचाळ,सलमा शेख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुलुंडमध्ये सिलिंडर स्फोटामुळे आग

News Desk

मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत

News Desk

पेण अर्बन बँकेतील ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांचा ‘वर्षा’वर धडक मोर्चा

News Desk
मुंबई

मुंबई विद्यापीठाचे उत्कृष्ट महाविद्यालये, आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

News Desk

मुंबई | प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालये आणि आदर्श शिक्षक–शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार ग्रामीण आणि शहरी विभाग या वर्गवारीतून देण्यात येतात.

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठीचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार ग्रामीण भागातून दापोली अर्बन बँक सिनिअर विज्ञान महाविद्यालय दापोली आणि सोनपंत दांडेकर महाविद्यालय पालघर यांना जाहीर करण्यात आले तर शहरी भागातून मिठीबाई महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर करण्यात आला.

तर शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठीचा ग्रामीण भागाच्या वर्गवारीतून अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय वसई आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर करण्यात आला. शहरी भागातून सेंट एँड्र्यूज महाविद्यालय आणि ना.ग. आचार्य आणि दा.कृ. मराठे महाविद्यालय चेंबुर यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहिर करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठीचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ग्रामीण भागाच्या वर्गवारीतून प्रा. स्नेहलता पुजारी तात्यासाहेब आठल्ये महाविद्यालय देवरुख, शहरी भागातून रेखा जगदाळे एच.बी. बीएड महाविद्यालय वाशी यांना प्रदान करण्यात आला.

तर मुंबई विद्यापीठ आदर्श शिक्षक पुरस्कार ग्रामीण भागातून डॉ. श्रीकांत चऱ्हाटे पिल्लाई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग एण्ड टेक्नॉलॉजी रसायनी खालापूर तर शहरी विभागातून डॉ. विजय दाभोळकर गुरुनानक महाविद्यालय जीटीबी नगर मुंबई यांना प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार नरेश परदेशी, कार्यालयीन अधीक्षक कोकण ज्ञानपीठ कर्जत कॉलेज, कर्जत आणि प्रसाद गवाणकर, वरिष्ठ लिपिक रं.प. गोगटे महाविद्यालय, रत्नागिरी यांना प्रदान करण्यात आला. तर शहरी भागातून सचिन गराटे, ग्रंथालय परिचर डी.जी. रुपारेल कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय माहिम आणि ए.एस.एम. सुंदरम, अधीक्षक गुरु नानक खालसा कॉलेज माटुंगा यांना गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.

Related posts

विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

swarit

शिवाजी पार्क येथे ६० वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk