HW News Marathi
मुंबई

किरीट सोमय्यांचा महाविकासविकास आघाडीच्या मंत्र्यांना इशारा!

पुणे | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. सोमय्या यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवारांपासून सुरुवात करायची की शरद पवारांपासून या संभ्रमात असल्याचा खोचक टिप्पणीही यावेळी केली. पुढील आठवण्यात अजून एका कॅबिनेट मंत्र्याचे घोटाळे कागदपत्रांसह लोकांसमोर आणणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला आहे.

शरद पवारांना टोला

किरीट सोमय्या यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी अतिक्रमण करते, हैराण करते. तर भावना गवळी यांनी 40 वेळा बँकेतून पैसे काढले आहेत. 21 लाखापेक्षा कमी पैसे काढले नाहीत. रिसोर्स अर्बन क्रेडिट सोसायटीमधून पैसे काढले. अन् शरद पवार म्हणतात की ईडी चौकशी का करते? एकूण 118 कोटींचा घोटाळा आहे. शरद पवारांना भावना गवळी यांना वाचवायचं असेल तर त्यांनी सांगावं, असा खोचक टोलाही सोमय्यांनी पवारांना लगावला आहे.

मी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय राहणार नाही

कितीही हल्ले करा, मी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. उद्घव ठाकरे यांची शिवसेना हास्यास्पद आहे. हे डाकूचं सरकार आहे, असा घणाघातही सोमय्या यांनी केलाय. त्याचबरोबर आठवड्याभरात 5-7 लोकांची झोपमोड होऊ द्या, मग तिसऱ्या अनिलचं नाव सांगतो, असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे. त्यामुळे हा तिसरा अनिल कोण? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

अजित पवारांमध्ये हिम्मत असेल तर….

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही सोमय्यांनी हल्ला चढवलाय. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? 65 कोटी रुपयांत कारखाना घेतला आणि 700 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. वैभव शिदे असं एका व्हॅल्युअरचं नाव आहे. शरद पवार यांना यासाठीच सहकार चळवळ हवी आहे का? असा सवालही सोमय्या यांनी केलाय. शरद पवार यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दिलासा मिळाला आहे. त्याबाबत विचारलं असता आगे आगे देखो होता है क्या, असं सूचक वक्तव्य सोमय्यांनी केलं आहे.

ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन

याबाबत किरीट सोमय्या म्हणाले, “ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला”, असं ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर

News Desk

लग्न झाले का?’ हा प्रश्न महादेव जानकरांना विचारायला हवा

News Desk

गोरेगावात १५ गाळ्याना आग

News Desk