HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते, कार्यकर्त्यांच्या नाराजीचे अजित पवारांनी सांगितले कारण!

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुका, निवडणुकांची रणनिती, ओबीसींचं राजकीय आरक्षण या विषयांवर चर्चा झाली. तसेच बैठकीत काही आजी माजी आमदारांनी तक्रारी मांडल्या. सत्तेत असलेले शिवसेना आणि काँग्रेस मतदारसंघातील कामं करत नसल्याची तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादीच्या मिटींगध्ये पराभूत उमेदवारांना बोलावलं होतं. तसेच आमदारांनाही बोलावलं होतं. आमदारांची कामे करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र पराभूत उमेदवार असं म्हणाले की त्यांना विकासकामे करण्यासाठी निधी कमी प्रमाणात मिळतो. ही त्यांची अडचण आहे.”

वरिष्ठ पातळीवर काही राजकीय समीकरण बदलली

“निवडणुका झाल्यानंतर शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांनी सराकर स्थापनेचा निर्णय घेतला. त्यानंतर तीन पक्षांनी सरकार स्थापण केले. यापुर्वी निवडून येतांना शिवसेनचा उमेदवार काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आला. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार शिवसेनेच्या विरोधात निवडून आला. याबाबत वरिष्ठ पातळीवर काही राजकीय समीकरण बदलली. मात्र स्थानिक पातळीवर काही प्रश्न निर्माण होतात. स्थानिक पातळीवर जेवढं एकमत व्हायला पाहिजे होतं. तेवढं झालं नाही. एकोपा, समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कार्यकर्ते, नेते या गोष्टी बोलून दाखवतात,”, अस अजित पवार म्हणाले.

राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आज (९ सप्टेंबर) झालेल्या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. आपल्या काही समस्या मांडत असतात. त्यांच्या ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल. म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

Aprna

मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास सुरू

News Desk

भाजपचे सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का? रोहित पवारांचा सवाल

News Desk