HW News Marathi
मुंबई

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घोषणांनी अंधेरी स्थानक दणाणले

मुंबई | गेली दोन वर्षे बांधून तयार असलेला रिक्षा डेक सुरु करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील रणरागिणींनी आज निदर्शने करून अंधेरी स्थानक दणाणून टाकले. या निदर्शनांना प्रवाशांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

पश्‍चिम रेल्वेने सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून बांधलेला रिक्षा डेक गेली दोन वर्षे तसाच पडून आहे. प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा हा रिक्षा डेक रेल्वेने विनावापर ठेवल्याबद्दल निदर्शकांनी संताप व्यक्त केला.

आज दुपारपासूनच येथे निदर्शक जमू लागले. रिक्षा डेक सुरु करा, प्रवाशांची सोय करा, अशा घोषणा निदर्शक देत होते. तीन कोटी रुपये खर्चून बांधलेला हा रिक्षाडेक सुरु का होत नाही, रिक्षा डेक सुरु न करणाऱ्या पश्‍चिम रेल्वेचा निषेध असो, रिक्षा डेक बंद ठेऊन लोकांचे हाल करणाऱ्या रेल्वेचा धिक्कार असो, अशा घोषणा लिहिलेले फलकही निदर्शकांच्या हातात होते. यानंतर शिष्टमंडळाने स्टेशनमास्तरांना निवेदनही दिले व लौकरच हे निवेदन पश्‍चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनाही दिले जाईल, असेही श्रीमती चव्हाण म्हणाल्या. रिक्षा डेक सुरू झाला तर ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, अपंग आदींना पुलाच्या पायऱ्या चढण्याचा त्रास घ्यावा लागणार नाही. तरीही रेल्वे हा रिक्षाडेक सुरु करीत नाही, पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माणुसकी नाही का, एलफिनस्टन सारखी दुर्घटना घडण्याची रेल्वे वाट बघत आहे का, असा प्रश्‍नही त्यांनी केला.

यावेळी तेथून येणारे जाणारे प्रवासीही उत्सुक्ततेने हे आंदोलन पहात होते. कित्येक प्रवासीही काही काळ या निदर्शनांमध्ये सहभागी झाले व त्यांनी या मागणीस पाठिंबा दिला.

यावेळी आंदोलकांनी प्रवाशांना या रिक्षाडेकची उपयुक्तता सांगणारी हॅंडबिलेही वाटली. प्रथम या रिक्षाडेक मुळे स्थानकाची सुरक्षा धोक्‍यात येईल असे न पटणारे कारण रेल्वे देत होती. आता या मार्गावर स्टॉल आहेत, असे दुसरे खोटे कारण रेल्वेने दिले आहे. रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या सुखदुःखाशी काहीच देणेघेणे नाही हेच यातून दिसते, असे पक्षाच्या मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर यांनी यावेळी सांगितले. रिक्षाडेक सुरु झाला तर खालच्या रस्त्यावरील गर्दी कमी होईल. अजूनही रेल्वेने हा रिक्षाडेक त्वरेने सुरु केला नाही तर येथे रिक्षा आणून उभ्या केल्या जातील, असा इशारा पक्षाच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष आरती साळवी यांनी दिला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यातील 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

News Desk

‘कंत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे बजेट’, अर्थसंकल्पावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

Manasi Devkar

केंद्राचा ‘हा’ निर्णय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा, उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

News Desk