HW News Marathi
मुंबई

भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | मध्य रेल्वेच्या भांडुप-कांजुरमार्ग रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून धावणाऱ्या एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली आहे. बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मध्य रेल्वे मार्गावर सकाळीच कार्यालयात जाताना बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावार पोहोचण्यास उशीर होणार आहे. भांडुप-कांजुरमार्ग या मार्गावर हा बिघाड झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून सदर घटनेची तातडीने दखल घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल अशी रेल्वे प्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ठाण्यात ट्रॅक ओलांडताना एकाचा मृत्यू

swarit

गणेशोत्सवाचं भक्तांचा उत्साह शिगेला

News Desk

खडसेंना फसविण्याचा दमानियांचा कट

Adil
राजकारण

मोदी सरकारचा क्रांतिकारक निर्णय

News Desk

नवीदिल्ली | ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक आणि ऍट्रॉसिटी कायद्याला संरक्षण देणारे विधेयक संसदेत मंजूर करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचे क्रांतिकारक ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.

ऍट्रॉसीटी कायदा शिथिल करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तो निर्णय रद्द करणारे विधेयक लोकसभेने मंजूर करून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. देशभरातील आंबेडकरी जनता या निर्णयाने समाधानी झाल्याचे सांगत रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक संसदेने मंजूर केल्याने ओबीसी समाजाने स्वागत केले आहे. या दोन्ही विधेयकांमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार दलित बहिजनांच्या हितासाठी कार्यरत आहे आणि या समाज घटकांच्या हितासाठी आपण केंद्रसरकार मध्ये खंबीर असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

ऍट्रॉसीटी कायद्याचे संरक्षण करणारे विधेयक संसदेत मांडावे या साठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. असे रामदास आठवले यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक खोटे आरोप करीत असून दलित बहुजनांच्या हितासाठी मोदी सरकार कार्यरत असल्याचे ऍट्रॉसिटीच्या संरक्षणासाठी मंजूर केलेले विधेयक आणि ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकार ने घेतल्याने विरोधक उघडे पडले आहेत असे ना रामदास आठवले म्हणाले.

Related posts

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक सजग, ३ हजार २११ तक्रारी दाखल

News Desk

मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली

News Desk

हार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही ?

News Desk