HW News Marathi
मुंबई

मरे’चे रडगाणे सुरूच

कल्याण – गेल्या आठवडाभरापासूनचे मध्य रेल्वेचे रडगाणे अद्यापही सुरूच आहे. मध्य रेल्वेवरीलआसनगाव ते वाशिंददरम्यानची सेवा मंगळवारी पुन्हा ठप्प झाली. त्यामुळे कल्याण-कसारा रेल्वे मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. ट्रॅक खालील भराव खचल्यानं सेवा थांबविण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे.

रेल्वे मध्येच थांबल्याने प्रवाशांनी अखेर ट्रॅकवर उतरून चालत पुढील स्टेशन गाठले. मध्य रेल्वेच्या सततच्या कटकटीला कंटाळलेले प्रवासी संपात व्यक्त करत आहेत. मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

२९ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या आसनगाव-वासिंद स्थानकांदरम्यान नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस घसरून अपघात झाला होता. आसनगाव आणि वाशिंददरम्यात वेहरोळी वस्तीजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डबे घसरले होते. यानंतर तब्बल ४ दिवस या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. शनिवारी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: खुला करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा भराव खचल्याने रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इंदिरा गांधीवरील ठरावावरून दोन्ही कॉँग्रेस आमने-समाने

News Desk

मध्य रेल्वेचा रविवार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

swarit

वाहतूक विस्कळीत झाल्याने डबेवाल्यांची सेवा बंद

News Desk
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

काबूल स्फोटांमध्ये 90 ठार, 150 जखमी; बायडन म्हणाले…

News Desk

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna

पोलिसांचे रौद्ररूप पाहून इंद्राणी बरॅकमध्ये पळाली

News Desk