HW News Marathi
मुंबई

मरे’चे रडगाणे सुरूच

कल्याण – गेल्या आठवडाभरापासूनचे मध्य रेल्वेचे रडगाणे अद्यापही सुरूच आहे. मध्य रेल्वेवरीलआसनगाव ते वाशिंददरम्यानची सेवा मंगळवारी पुन्हा ठप्प झाली. त्यामुळे कल्याण-कसारा रेल्वे मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. ट्रॅक खालील भराव खचल्यानं सेवा थांबविण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे.

रेल्वे मध्येच थांबल्याने प्रवाशांनी अखेर ट्रॅकवर उतरून चालत पुढील स्टेशन गाठले. मध्य रेल्वेच्या सततच्या कटकटीला कंटाळलेले प्रवासी संपात व्यक्त करत आहेत. मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

२९ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या आसनगाव-वासिंद स्थानकांदरम्यान नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस घसरून अपघात झाला होता. आसनगाव आणि वाशिंददरम्यात वेहरोळी वस्तीजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डबे घसरले होते. यानंतर तब्बल ४ दिवस या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. शनिवारी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: खुला करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा भराव खचल्याने रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’चा फटका आयपीएलला बसणार?

swarit

आरपीएफ उपनिरीक्षकाच्या आत्महत्येचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

swarit

तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते कमल हसन यांनी घेतलेल्या प्रवेशावर राज ठाकरेंच व्यंगचित्र

Adil