HW News Marathi
मुंबई

राष्ट्राभिमानी समितीच्या वतीने शिवाजी पार्कमध्ये स्वच्छता मोहीम

मुंबई | राष्ट्राभिमानी समितीच्या मार्गदर्शनाखाली बालगोपाळ माऊली गोविंदा पथकाने काल मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंड्या फोडल्या मात्र हे करत असताना त्यांच्या निदर्शनास आले की बरेच गोविंदा हे जिथे जेवण करण्यास बसतात तिथेच अस्वच्छता करून निघून जातात. शिवजीपार्क परीसरात देखील असा कचरा पहायला मिळाला. शिवाजी पार्क हे वेगवेगळ्या खेळासाठी, राजकीय पक्षांच्या सभा व मोठं मोठ्या उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. अश्या ठिकाणी गोविंदांनी कचरा केला होता.

हे सर्व माऊली गोविंदा पथकाने पाहिल्यानंतर दहीहंडीच्या दुसऱ्याच दिवशी स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांच्याशी संपर्क साधल्यावर खैरनार यांनी त्वरित सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. दहीहंडीच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवार दिनांक ४ सप्टेंबर २०१८ ला राष्ट्राभिमानी समितीच्या बालगोपाळ माऊली गोविंदा पथकाने शिवाजी पार्क स्वच्छतेची मोहीम आखली व त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते व सोबत काही महानगर पालिका कर्मचारी मिळून स्वच्छता मोहीम राबवली.

एक टेम्पो भरून कचरा मिळाला त्यात दारूच्या बाटल्या देखील खूप प्रमाणात होत्या. ही मोहीम काढण्यामागे समितीचा एकच उद्देश होता की किमान यापुढे तरी उत्सव साजरा करताना पर्यावरण देखील स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे. हे विसरून चालणार नाही. हा संदेश इतर मंडळांपर्यंत पोहोचावा. कार्यक्रमाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष प्रशांत पळ यांनी केले. सोबत मार्गदर्शक विलास फडके, महिला अध्यक्षा वनिता चेटियार पदाधिकारी संतोष नारायणे, दत्तात्रय वाळंज, अर्जुन शिंदे, शंकर भोमिक व राजेश पवार यांनी सहभाग घेऊन स्वच्छता अभियान राबवले. ह्या उपक्रमास स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचाही आम्हा सर्वांना खूप पाठिंबा मिळाला असे समितीचे विलास फडके यांनी आवर्जून सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई, उपनगर, वसईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस

News Desk

आर्यन खानला पुन्हा धक्का! ड्रग्ज प्रकरणात जामीन अर्ज फेटाळला

News Desk

“…ते वाघ आहे की नाही हे मला माहित नाही”; राऊतांच्या सुटकेवर सत्तारांची पहिली प्रतिक्रिया

Darrell Miranda
देश / विदेश

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण l आरोप निश्चितीला स्थगिती नाही – उच्च न्यायालय

News Desk

मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित यांनी कनिष्ठ न्यायालयाकडून आरोप निश्चितीला स्थगिती देण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. परंतु उच्च न्यायालयाने ही मागणी पूर्णतः फेटाळून लावली आहे. या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला 5 सप्टेंबरपासून (बुधवार) सुरुवात होणार आहे.

2008 साली झालेला मालेगाव बॉम्बस्फोट हा अभिनव भारत या हिंदुत्त्ववादी संघटनेने घडवून आणला होता असे तपासातून उघड झाले. या हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधित कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आणि एकूण 11 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. बुधवारी सुरू होणाऱ्या आरोप निश्चिती प्रक्रियेला स्थगिती मिळावी अशी मागणी करणारी याचिका कर्नल पुरोहित यांनी न्यायालयात केली होती.

त्याचप्रमाणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकणाच्या तापसाबाबत एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करणात आली होती. मात्र याचिकेवर सुनावणी देण्यास न्या. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नकार दिला आहे. ही याचिका सत्र न्यायालयातच दाखल करण्यात यावी असे यावेळी न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

Related posts

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने नागरिकांना भेट, ऑनलाईन तपासा सर्व तपशील

News Desk

भगतसिंग यांना का दिली वेळेआधी फाशी ?

News Desk

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

News Desk