HW News Marathi
मुंबई

फेरीवाला हटाव मोहीमेवरून काँग्रेस मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

– दादर मध्ये तणावाचे वातावरण

– दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई – एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यां विरोधात मनसेने जोरदार मोहीम सुरू केली होती. त्यात अनेक फेरीवाल्यांना मनसैनिकांनी चोपही दिला होता. अधिकृत फेरीवाल्यांवर अन्याय नको ही काँग्रेसची भूमिका होती. शिवाय गरीब फेरीवाल्यांना मारहाण कशासाठी असा सवाल मुंबई काँग्रेसने केला होता. म्हणूनच मुंबई काँग्रेसने फेरीवाला सन्मान मोर्चाची हाक दिली होती. तो मोर्चा आज दादरमध्ये आयोजित करण्यात आला होता. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं हा मोर्चा काढला आहे. मात्र, या मोर्चामुळे दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकां समोर भिडले. फेरीवाल्यांच्या मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. यावेळी पोलिसांनी मनसे-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याचे कारण देत पोलिसांनी फेरीवाला सन्मान मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली होती. तरीही काँग्रेसनं हा मोर्चा काढला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

News Desk

तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

News Desk

माहुल प्रकल्पग्रस्तांचे ‘जीवन बचाव आंदोलन’

swarit