HW News Marathi
मुंबई

संविधान बदलू देणार नाही

मुंबई | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशाला संविधान दिले आहे ते बदलण्यासाठी नाही,तसा प्रयत्न सुद्धा या सरकारने करू नये असा इशाराच जेष्ठ साहित्यिक व दलित चळवळीतील नेते अर्जुन डांगळे यांनी माटुंगा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सदिच्छा सामाजिक विकास संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिला आहे.

ते पुढे म्हणाले, कमीत कमी सरकारने किंवा देशाच्या प्रमुख्याने त्या संविधानाचे वय लक्षात घ्यावे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे संविधान संसदेत मांडले हि देशाची घटना लिहताना डॉ बाबासाहेबानी अहोरात्र मेहनत घेतली आणि तेच तुम्ही बदलण्याची भाषा करता हे योग्य नाही जर तुम्ही असा प्रयत्न जरी केला तर संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.व ते आम्ही बदलू देणार नाही. याची काळजी सरकारने घ्यावी,यावेळी डांगळे यांनी सडेतोडपणे बाबासाहेबांचे विचार येथे मांडले.यावेळी सदिच्छा सामाजिक विकास संस्था नुसती जयंती साजरी करत नाही तर लोंकाना अपेक्षित असलेले बाबासाहेबांचे विचार पोचवण्याचे कार्य करत आहेत त्यांनी हे कार्य असेच चालू ठेवावे माझ्या त्यांना सदैव शुभेच्छा असतील यावेळी माजी सहा. पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी देखील खूप छान ‘जण गणं मन’ या राष्ट्रीय गीताचा अर्थ सांगितला, साहित्यिक व समाजसेवक डॉ शांताराम कारंडे यांनी तरुणांनी शिक्षणावर भर देऊन आपले भविष्य उज्वल करण्याचा प्रयत्न करावा जेवढे शिकाल तेवढे कमीच असेल म्हणून जास्तीजास्त वाचन करून बाबासाहेबांचे विचार जगाला पटवून द्या असे सांगितले यावेळी आम वर्षाताई गायकवाड व सर्वानीच सदिच्छा सामाजिक विकास संस्थेला शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा विभागात कार्यरत असलेल्या व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या प्रतिष्ठित अशा सदिच्छा सामाजिक संस्थेचे समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजबांधवांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी जीवन गौरव पुरस्कार आयु के एस घेगडमल यांना देण्यात आला. समाजगौरव पुरस्कार आयु सीताराम भालेराव,बाबुराव कांबळे, पत्रकार कांचन जांबोटी, धगधगती मुंबई चे संपादक भीमराव धुळप,आयु सचिन गायकवाड,गणेश बच्छाव, तर तर समाजभूषण पुरस्कार आयु मनोहर तांबे,बाळू किसान देठे,(बोद्धचार्य) आयु मंगलाताई जावळे, धम्म प्रेरणा पुरस्कार* सौ स्नेहा देठे,कु जयेश कांबळे,सुजाता पवार, आदी मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर झाले असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्त्यिक अर्जुन डांगळे,माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी, समाजसेवक डॉ शांताराम कारंडे, आम, वर्षाताई गायकवाड,आरजू संस्थेचे मेहता,नगरसेविका हर्षदा मोरे,समाजसेवक आशिष मोरे,अध्यक्ष सुनील कांबळे,भगवान कर्डक,सर्व पदाधिकारी आदी मान्यवर व मोट्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव शशिकांत गायकवाड यांनी केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्राचे ‘उंदरालय’ सामनातून सरकारवर टीका

News Desk

आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का; कार्यकर्त्याचा अजित पवारांना सवाल

News Desk

Dahi Handi | कुर्ल्यामध्ये त्रिमूर्ती सेवा मंडळ गोविंदा पथकाने फोडली मानाची हंडी

News Desk