HW News Marathi
मुंबई

महाराष्ट्राचे ‘उंदरालय’ सामनातून सरकारवर टीका

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मंत्रालयातील ‘उंदीर घोटळा’ उघडकीस आणला. मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसात मारले, असा सवाल एकनाथ खडसे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. तसेच त्यांनी या उंदीरांना मारण्यासाठी विष कुठून आले, विष मंत्रालयात आण्यासाठी कोणी परवानगी दिली, किती विष लागले, मारलेल्या उंदीरांची विल्हेवाट कुठे केली, धर्मा पाटील यांनी जे विष घेतले ते हेच विष होते का? असे अनेक सवालही त्यांनी सभागृहात उपस्थिती केला होता. यानंतर घोटाळ्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली.

सामना संपादकीयमध्ये नेमके काय बोले

या घोटाळ्याचा खरपूस समाचार सामनाच्या संपादकीय मधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. ‘उंदीर घोटाळ्याने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीने पारदर्शक कारभार ढोलही फोडले आहेत, येथील तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत, मंत्रालयाची जमीन ‘भुसभुशीत’ झाली आहे, असे आरोप सत्ताधारी पक्षाचे लोक करीत आहेत.

महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू ‘उंदरालय’ झाले आहे. एकनाथ खडसे यांनी कोणत्या हेतूने या घोटाळ्याचा स्फोट केला हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण ‘अमुक-तमुक मुक्त’ करण्याची भाषा करणाऱ्यांच्याच राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्याचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे !’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या…!

News Desk

भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी करा भिडे गुरूजी

News Desk

लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा सखोल अभ्यास

News Desk