HW News Marathi
मुंबई

विरोधकांचा सरकारविरोधात ३१ पासून जनआक्रोश

मुंबई- सरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासाठी सरकारविरोधात ३१ आॅक्टोबरपासून काँग्रेसकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. जनआक्रोश आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं आहे. ३१ आॅक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी अहमदनगर जिल्ह्यातून जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात होणार आहे. तर सांगलीत विराट जाहीर सभेने जनआक्रोश आंदोलनाची सांगता करण्यात येईल. मुंबईत राधाकृष्ण पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलत होते.

नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला असून देशाचंही मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे नोटबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होते आहे. त्याचदिवशी काळा दिवस पाळणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं. कर्जमाफी म्हणजे आकड्यांचा फसवा खेळ असून शेतकºयांच्या हाती काहीही लागले नाही. अटी शर्ती घालून शेतकºयांना कर्जमाफीतून वगळले आहे. राज्यात कर्जमाफीचा सावळा गोंधळ सुरू असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी केली आहे. २००८-०९ च्या कर्जमाफीत गैरव्यवहाराचा आरोप चुकीचा आहे. सरकारला त्याची आता आठवण का येतेय? तेव्हा विरोधक म्हणून हे काय करत आहे, असा सवालही अशोक चव्हाण यांनी विचारला. कापूस खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीच्या सक्तीची अट तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

किंग्ज सर्कलजवळील पुलाखाली अडकलेला कंटेनर हटवण्यात यश

News Desk

पेट्रोलपंपावर मध्यरात्रीपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाही

News Desk

आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

News Desk
मनोरंजन

मोदींची नक्कल केल्याने कलावंताची हकालपट्टी

News Desk

मुंबई: स्टार प्लस वाहिनीवरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोचे नवीन पर्व सुरू झाल्यापासून तो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करण्यात प्रसिद्ध असलेल्या कॉमेडीयन श्याम रंगीलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या मंचावर मोदींची हुबेहूब नक्कल करताना पाहायला मिळतो. मात्र, वाहिनीने रेकॉर्ड केलेला हा भाग प्रसारित करण्यास नकार देत कार्यक्रमातून त्याची हकालपट्टी केल्याचा आरोप त्याने केला आहे.

द वायर या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत श्याम रंगीलाने हे आरोप केले आहेत. त्याने म्हटले की, मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करतानाचा हा भाग चित्रीत झाल्यानंतर जवळपास एक महिन्यांनंतर मला कार्यक्रमाच्या प्रॉडक्शन टीमकडून फोन आला. त्यांनी मला पुन्हा नव्याने चित्रीकरणासाठी बोलावले. मोदींची नक्कल करतानाचा भाग प्रसारित न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. तुम्ही राहुल गांधींची नक्कल करू शकता मात्र मोदींची नाही असे मला वाहिनीकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्पर्धकांना आॅडिशन द्यावी लागते. पण, नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांची हुबेहूब नक्कल करतानाचे श्याम रंगीलाचे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला थेट कार्यक्रमात सहभागी होण्यास निमंत्रण दिले गेले.

Related posts

मल्लिकाने घेतली फस्ट लेडीची भेट

News Desk

दिवाळीच्या फराळासाठी घरच्या घरी करा ‘नाशिक चिवडा’

swarit

FLASHBACK 2018 : समलैंगिकता गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk