HW News Marathi
मुंबई

रेल्वे स्थानकाजवळ डबेवाल्यांसाठी खास सायकल स्टॅण्ड

मुंबई | ‘मॅनेजमेंट गुरू’ अशी जगभर ख्याती असलेल्या डबेवाल्यांसाठी लवकरच रेल्वे स्थानकांजवळ सायकल स्टॅन्ड उभारण्यात येणार आहेत. याबाबतच पालिका प्रशासनाच्या प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी होणार असून हजारो डबेवाल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सद्यस्थितीत सुमारे दोन लाख जेवणाचे डबे चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत नियमित वेळेत पोहचवण्याचे काम करीत आहेत. डबेवाले जेवणाचे डबे सायकलव रेल्वेच्या माध्यमातून पोहचवतात, मात्र रेल्वे स्थानकाबाहेर त्यांच्या सायकली उभी करण्याची सुविधा नसल्याने त्यांना घाईगर्दीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो. डबेवाल्यांची ही समस्या दूर करण्यासाठी स्थानिक प्राधिकरण या नात्याने मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांच्या जवळपास असणाऱ्या पालिकेच्या जागांवर डबेवाल्यांसाठी सायकल स्टॅण्ड उभारण्याचा प्रस्ताव आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत 108 मिलीमीटर पावसाची नोंद

News Desk

Raksha Bandhan Special | राष्ट्राभिमानी समितीचे अनोखे रक्षाबंधन…

News Desk

काय कारण | उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत नियोजित बैठक तडकाफडकी रद्द झाली

News Desk
राजकारण

संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका लढवणार

News Desk

पुणे | संभाजी ब्रिगेडने सांस्कृतिक आणि ऐतिहासिक लढा तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा याबाबत पुढाकार घेतला आहे. ग्रामपातळीवर याविषयी प्रबोधन केले आहे. तसेच जनसामान्यांचे प्रश्‍न जाणून घेतले आहेत. जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, संभाजी ब्रिगेड येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांनी दिली.

चिंचवड येथे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावाप्रसंगी मार्गदर्शन करताना सुधीर देशमुख बोलत होते. जनसामान्यांच्या प्रश्‍नाबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अनेक अडचणी जाणवल्या आहेत. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने स्वतः राजकारणात येऊन लोकांच्या समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे.

Related posts

पुण्यात गिरीश बापट यांच्याविरोधात पाणी प्रश्नावरून बॅनरबाजी

News Desk

अरुण गवळीला हवी २८ दिवसांची संचित रजा

News Desk

शिवाजी पार्कवर सभा घेण्यास ओवेसींना परवानगी मिळते, मग राहुल गांधींना का नाही ?

News Desk