HW News Marathi
मुंबई

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी महापालिकेला ३१ मे ची डेडलाइन

मुंबई | मेट्रो, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अशा विविध प्राधिकरणांची विकासकामे मुंबईत सुरू आहेत. मात्र, या खोदकामांमुळे त्या परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईची तुंबापुरी होऊ नये. यासाठी महापालिकेला पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मेपर्यंत मुंबई खड्डे मुक्त करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

सध्या मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पामुळे अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असल्यामुळे मुंबईतील रस्त्यात खड्डे पडले आहेत. मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी सरकारने ३१ मेची डेडलाइन दिली आहे. मुंबईत पालिकेने जवळपास एक हजार १०६ कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. यापैकी सध्या ५२२ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये ४६ मुख्य रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.

मात्र, पावसाळ्याला अवघा एक महिना बाकी असताना. ही सर्व कामे पालिकेला पुर्ण करायची आहेत. उर्वरित ५८४ कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहेत. यापैकी एप्रिल अखेरपर्यंत ८७९ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मरण्यासाठीही आता ‘आधार’ हवे

News Desk

बातमीचा इम्पॅक्ट | धारावीचा शेटवाडी नाला झाला साफ

swarit

मुंबईतील आठ पोलीस स्टेशनची धुरा महिला अधिकाऱ्यांच्या हाती

News Desk