HW News Marathi
मुंबई

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी महापालिकेला ३१ मे ची डेडलाइन

मुंबई | मेट्रो, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अशा विविध प्राधिकरणांची विकासकामे मुंबईत सुरू आहेत. मात्र, या खोदकामांमुळे त्या परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईची तुंबापुरी होऊ नये. यासाठी महापालिकेला पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मेपर्यंत मुंबई खड्डे मुक्त करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

सध्या मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पामुळे अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असल्यामुळे मुंबईतील रस्त्यात खड्डे पडले आहेत. मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी सरकारने ३१ मेची डेडलाइन दिली आहे. मुंबईत पालिकेने जवळपास एक हजार १०६ कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. यापैकी सध्या ५२२ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये ४६ मुख्य रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.

मात्र, पावसाळ्याला अवघा एक महिना बाकी असताना. ही सर्व कामे पालिकेला पुर्ण करायची आहेत. उर्वरित ५८४ कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहेत. यापैकी एप्रिल अखेरपर्यंत ८७९ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ब्रेकिंग | माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या

News Desk

प्रजा फाउंडेशन तर्फे आमदारांचे वार्षिक कार्य अहवाल प्रकाशित

swarit

“बजेटचा डोंगर, निघाला उंदीर…”,अर्थसंकल्पावर ‘मविआ’च्या आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Aprna
महाराष्ट्र

टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना राज्य सरकार प्रोत्साहन देणारः सुभाष देसाई

swarit

मुंबईः टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्रान्स येथील शिष्टमंडळास दिले.

मोठ्या शहरात दिवसेंदिवस स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. याचसोबत कालबाह्य झालेल्या वाहनांची समस्यादेखील सर्वांना भेडसावत आहे. कालबाह्य वाहने नष्ट करून किंवा त्या वाहनांचा पुन्हा वापर करण्यासाठी फ्रान्सची इंदिरा कंपनी कार्यरत आहे. भारतात ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरण संवर्धानासोबत भंगार वाहने नष्ट करण्याचे काम ही कंपनी करत आहे. जगभरात अनेक देशात कंपनी काम करते. भारतात देखील ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.

यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बे रोझेट, तांत्रिक विभाग प्रमुख आँलिवर ग्वाझु, महिंद्रा सनयो स्पेशल स्टिल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उदय गुप्ता, कार्यकारी अधिकारी दिलीप पाचपांडे, सल्लागार सतीश घोरगे, नाथ इक्जिमचे संचालक विरंजन नाथ आदी उपस्थित होते. दरम्यान, पुनर्वापर आणि प्रक्रिया हे भविष्याची गरज असून उद्योग मंत्रालय अशा कंपन्यांना कायम पाठिंबा देईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या कंपन्या सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अशा प्रकारच्या कंपन्या सुरू करण्यासाठी राज्य सरकार विशेष धोरण तयार करेल, असे आश्वासन देसाई यांनी दिले.

Related posts

एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला, शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

महाराष्ट्रावर तौक्ते चक्रीवादळाचं संकट, मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली चर्चा

News Desk

“तुम्हा सगळ्यांना मीच पुरुन उरेल…”, चित्रा वाघ भडकल्या

News Desk