HW News Marathi
मुंबई

विकासकांचा ३४० ते ४२० चौरस फुटांच्या घरांकडे ओढा

मुंबई | बांधकाम क्षेत्रांतील आर्थिक चणचण पाहता नामांकित विकासकांनी छोटी घरे बांधण्याकडे पाऊल टाकले आहे. यात ३४० ते ४२० चौरस फुटांची घरे २५ लाखांपासून ते ५४ लाखांपर्यंत उपलब्ध करून दिली जात आहेत. विशेष म्हणजे नव्या विकास नियंत्रण नियमावलीत व्यावसायिक संकुलासाठी अधिकचे चटई क्षेत्रफळ देण्यात आले असूनही विकासक छोट्या घरांच्या उभारणीत अग्रेसर पाहायला मिळत आहे.

सध्या मुंबईलगत असलेल्या पालघर, डहाणू, वसईविरार, नायगाव तसेच मीरा-भाईंदर, घोडबंद तर दुसरीकडे भिवंडी, कल्याण, डोंबिवली या भागांत नामांकित विकासकांचे छोट्या निवासी सदनिका बांधण्याचे काम सुरू आहेत. यात शेकडो घरांचा प्रकल्प २६ पासून ते १०० एकरवर उभारण्यात येत आहे. यात हावरे प्रॉपर्टी, निर्वाणा रिअँल्टी, संघवी पार्श्व या विकासकांचे मोठे प्रकल्प सुरू आहेत.

राज्य सरकारकडूनही विकास नियमावलीत जादा चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे रोजगार वाढण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र सध्या व्यावासियक संकुलाऐवजी निवासी संकुलावर भर देण्यात आला आहे.

सध्या वाडा आणि डहाणूत २६ एकरहुन अधिक एकरांवर आमचे प्रकल्प सुरू आहेत. यात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारण्यात आमचा मानस असल्याचे निर्वाणा रिअँल्टीचे सीईओ पुनीत अग्रवाल यांनी सांगितले. तर कल्याण येथे सर्वसामान्यांना परवडणारी शेकडो घरांचा प्रकल्प सुरू आहे. यात मोठ्या घरांच्या प्रकल्पाप्रमाणे अत्याधुनिक सेवा सुविधा ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे हावरे प्रॉपर्टीचे सीईओ आणि जाँइट एमडी अमीत हावरे यांनी सांगितले. तसेच आटगाव आणि भिवंडी भागांत छोट्या आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प सुरू असल्याचे संघवी पार्श ग्रुप ऑफ कंपनीजचे सीएमडी रमेश संघवी यांनी सांगितले.

बांधकाम क्षेत्रात आर्थिक चणचण सुरू असल्याने विकासही व्यावसायिक संकुलांची उभारणीकरण्या ऐवजी निवासी संकुलांची उभारणी करून बांधकाम क्षेत्राला सावरू पाहत असल्याची प्रतिक्रिया बांधकाम क्षेत्र अभ्यासक प्रीतम धामणस्कर यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत पेट्रोल दराने नव्वदी गाठली…

News Desk

सिनेट निवडणूकीतील नोंदणीचे पन्नार हजार शुल्क मुंबई विद्यापीठाने लाटले

News Desk

केईम रुग्णालय परिसरातील उघडेबाबावर कारवाई होणार ?

News Desk
राजकारण

#RamMandir : शरद पवार यांचा राम मंदिरावरुन सेनेला टोला

News Desk

मुंबई | देशातील मुळ प्रश्नांना बगल देउन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिर आणि अयोध्येचा मुद्दा पुन्हा पुन्हा समोर आणला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहे. त्यांच्या हाताला काम नाही, जनावरांना चारा-पाणी नाही, असे ते म्हणाले. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धनकवडी येथे आयोजीत करण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे लोकर्पण शरद पवार यांच्या ह्स्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

‘संविधानाचा आशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील लोकशाही व्यवस्था अजूनही टिकून आहे. सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाच्या मार्गानेच जावे लागणार आहे’, असेही पवार म्हणाले. या कार्यक्रमाला रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, खासदार सुप्रिया सुळे, अॅड. वंदना चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नगरसेवक संयोजक विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, किशोर धनकवडे, अश्विनी भागवत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

Live Update : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल

News Desk

उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा, संप सुरूच !

News Desk

पुढच्या ४८ तासांत युतीबाबत निर्णय घ्या अन्यथा… !

News Desk