HW News Marathi
राजकारण

#RamMandir : शरद पवार यांचा राम मंदिरावरुन सेनेला टोला

मुंबई | देशातील मुळ प्रश्नांना बगल देउन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिर आणि अयोध्येचा मुद्दा पुन्हा पुन्हा समोर आणला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहे. त्यांच्या हाताला काम नाही, जनावरांना चारा-पाणी नाही, असे ते म्हणाले. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धनकवडी येथे आयोजीत करण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे लोकर्पण शरद पवार यांच्या ह्स्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

‘संविधानाचा आशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील लोकशाही व्यवस्था अजूनही टिकून आहे. सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाच्या मार्गानेच जावे लागणार आहे’, असेही पवार म्हणाले. या कार्यक्रमाला रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, खासदार सुप्रिया सुळे, अॅड. वंदना चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नगरसेवक संयोजक विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, किशोर धनकवडे, अश्विनी भागवत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

Manasi Devkar

अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांनी नाकारल्या सर्व सरकारी सुविधा

News Desk

मोदींचे सरकार संविधानाचा गौरव करणारे सरकार

News Desk