HW News Marathi
मुंबई

महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकादरम्यान अडकली, घटनास्थळी एनडीआरएफ दाखल

मुंबई । कल्याण, बदलापूरसह अंबरनाथ परिसरात शुक्रवार (२७ जुलै) मध्य रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे वांगणी येथे महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली असून २ फूट पाणी ट्रॅकवर साचले आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे. याठिकाणी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. तसेच अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौंड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. वांगणी येथे पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. बदलापूर ते कर्जत खोपोली दरम्यानची रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौड मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna

अतिवृष्टीमुळे परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार

News Desk

यंदा चक्क श्रींच्या एवढ्या मुर्तींचे झाले विसर्जन !

swarit