HW News Marathi
मुंबई

शेतकऱ्यांचा लाल सागर मुंबईत धडकला, सरकारची धावपळ सुरू

मुंबई | नाशिक ते मुंबई असा सुमारे दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे शेतकरी विधानभवनाला घेराव घालणार आहेत. दरम्यान, मोर्चाची व्याप्ती पाहून सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी तत्काळ मंत्रिगटाची स्थापना करण्यात आले आहेत. दुपारी दोन वाजचा शेतकरी नेत्यांसोबत हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.

शेतकरी मोर्चामुळे संपूर्ण आझाद मैदन परिसरात लाल सागर पसरला आहे. गेल्या सहा दिवसांपासून उन वाऱ्याची पर्वा न करता, पिचलेला शेतकरी आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान, वन जमिन शेतकऱ्यांच्या नावे मिळावी, ही मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर सरकार काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लाठ्या काठ्या खावू वेळ पडल्यास गोळ्या झेलू परंतु मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याचे समजते.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच हा मुद्दा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करून सरकार सहा दिवस झोपले होते, का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षक परिषद भाजपाकडून हायजॅक !

News Desk

मुंबईकरांची तारांबळ करून, भाजपचे जोरदार प्रदर्शन

News Desk

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या तळमजल्यावर लागलेली आग आटोक्यात

News Desk