HW News Marathi
मुंबई

गडकरींच्या विरोधात मच्छिमारांमध्ये तीव्र संताप

मुंबई | मच्छिमारांनी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात स्थानिक भाजपा आमदार राज पुरोहित यांनी बंडाचा काळा झेंडा हाती घेतला आहे. कच्छ ते कन्याकुमारीपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात केंद्र सरकारच्या नौकानयन शिप कोरिडोर विरोधात आंदोलन केले आहे. केंद्र सरकार विरोधात पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने मासेमारी करण्याऱ्या मच्छिमारांनी कुलब्यातील सासून डॉक येथे एकवट होऊन आंदोलन केले आहे. सर्व व्यापारी जहाज अडवू असा इशारा या आंदोलनात मच्छिमारांनी दिला आहे. या आंदोलनाला थांबवण्यासाठी मुंबई पोलीस पथक लावण्यात आले आहे.

मच्छिमारांना पाठिंबा मिळण्यासाठी आमदार भाई जगताप आणि आमदार राज पुरोहित या आंदोलनात उपस्थित आहेत.या संदर्भात केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मच्छिमरांनी शिष्ठमंडळाची चर्चा झाली परंतु गडकरींनी कोणत्याही बातम्या मान्य केल्या नाही.त्यामुळे केंद्र सरकार विरोधात मच्छिमारांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई विमानतळावर मेगाब्लॉक, तिकीट दरावर होणार परिणाम

News Desk

चालत्या लोकल मध्ये ‘किकी चॅलेंज’, तरुणाचा शोध सुरू

swarit

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात इमारतीला स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही

News Desk
राजकारण

आपल्या विधानानंतर अवघ्या २४ तासातच राहुल गांधींनी दिले हे स्पष्टीकरण

Gauri Tilekar

नवी दिल्ली | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेय चौहान याचे नाव पनामा पेपर्समध्ये असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता राहुल गांधी यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले होते. मध्य प्रदेशातील पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले कि, “पनामा पेपर्समध्ये शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाही तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचे नाव आहे. शिवराज सिंह यांचे नाव तर व्यापमं घोटाळ्यात होते.”

आपल्या विधानानंतर २४ तासांच्या आत राहुल गांधी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. मध्य प्रदेश दौऱ्यात बोलताना राहुल गांधी यांनी शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या मुलावर आरोप केले होते. त्यानंतर मध्यरात्री ट्विट करून आपण राहुल गांधी यांच्याविरोधात आज (मंगळवारी) अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे चौहान यांनी म्हटले होते.

त्याचप्रमाणे कार्तिकेय सिंह यांनी देखील ट्विट करून राहुल गांधींचे विधान खोटे असल्याचे म्हटले होते.“पनामा पेपर्समध्ये माझे नाव आल्याचे राहुल गांधी यांचे विधान खोटे आहे. सार्वजनिक व्यासपीठावरुन माझी आणि माझ्या कुटुंबीयांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. यामुळे मी दुःखी आहे. ४८ तासांच्या आत जर राहुल यांनी माफी मागितली नाही तर याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करेन,” असे कार्तिकेय यांनी म्हटले होते.

राहुल गांधींचे विधान

“पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आल्यानंतर पाकिस्तानसारख्या देशानेही कारवाई करत त्यांना कारागृहात पाठवले. मात्र शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये येऊनही त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली गेली नाही,” अशी टीका राहुल गांधींनी केली होती.

Related posts

येत्या काळात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल !

News Desk

भाजपमधील नेते मोदींकडे गेले कि त्यांच्या बायका घाबरतात कारण… !

News Desk

प्रचाराच्या तोफा शांत झाल्या आहेत !

News Desk