HW News Marathi
मुंबई

मुंबईत डेंग्यूचे पाच तर लेप्टोचा एक बळी, आरोग्य खात्याचा अहवाल

मुंबई । पाऊसत साथींच्या आजाराचे प्रमाण वाढे परंतु आता पाऊस नसतानाही साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकरांचा ताप वाढला असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये शहर-उपनगरात डेंग्यूचे पाच बळी गेले असून लेप्टोचा एक बळी गेला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये लेप्टो आणि डेंग्यूमुळे तब्बल १२ बळी गेले होते. तसेच मुंबईत यंदाच्या वर्षी पहिला स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याची नोंदही या अहवालात आहे. सध्या या रुग्णावर उपचार सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यात ४ हजार ३६५ डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळले असून त्यांच्यावर पालिकेच्या विविध रुग्णालयांत, दवाखान्यांत उपचार सुरू आहेत.

डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूत

कांदिवली पूर्व आकुर्ली मार्ग येथील १३ वर्षीय मुलाचा समावेश आहे. या मुलाला सलग ४ ते ५ दिवस ताप, उलट्यांचा त्रास होत होता. त्यानंतर त्याला २६ सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तिथून पालिका रुग्णालयात हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना २८ तारखेला त्याचा मृत्यू झाला. तसेच एक आठवडा लंडनला प्रवास करून आलेल्या ४२ वर्षीय वाळकेश्वर येथील महिलेचाही डेंग्यूने मृत्यू झाल्याची नोंद आहे. २० सप्टेंबर रोजी महिलेला ताप, अंगदुखी, मळमळ या कारणांमुळे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. यानंतर २८ सप्टेंबर रोजी त्या महिलेचा मृत्यू झाला.

पालिकेची मोहिम

पालिकेद्वारे घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २ हजार ६७ घरांतील ६ लाख ५० हजार ११७ लोकसंख्येची तपासणी करण्यात आली आहे. मोहिमेत डासांची तब्बल ४ हजार ७९३ उत्पत्तीस्थळे आढळली असून त्यांवर कीटकनाशक फवारणी केली आहे. तसेच २२ हजार ४७३ डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

1300 मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

swarit

शून्य कचरा प्रदर्शनातून नागरिकांनी घेतले खत निर्मितीचे प्रशिक्षण

News Desk

नऊ तासांत तिनशे मिलिमीटर पाऊस

News Desk
महाराष्ट्र

सत्तेत येण्यासाठी आम्ही अनेक आश्वासने दिली | गडकरी

swarit

मुंबई । ‘सत्तेत येण्यासाठी आम्ही अनेक आश्वासन दिली, आणि आता त्यातली काही आश्वासन आमच्या लक्षात देखील नाही.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कलर्स मराठी या वाहिनीवरील “अस्सल पाहुणे इरसाल नमुने” या कार्यक्रमामध्ये मुलाखती दरम्यान हे म्हणाले. पुढे असे देखील म्हणाले की, २०१४मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही सत्तेत येऊ याची खात्री आम्हाला वाटत नव्हती. या कार्यक्रमात गडकरींसोबत जेष्ठ अभिनेता नाना पाटेकर असे दोन दिग्गज व्यक्तींनी काल (४ ऑक्टोम्बर २०१८) रोजी कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोन्ही दोघांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत.

तसेच शरद पवार यासारख्या दिगग्ज नेत्यांचे कौतुक केले. शरद पवारांबद्दल गडकरी म्हणाले की, शरद पवारांना राजकारणात कोणीच ओळखू शकत नाही . त्यांनी शेती,औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांचे त्यांना ज्ञान आहे. गप्पा मारतानाच्या दरम्यान शरद पवारांबद्दल कोणती बाब खटकते हा प्रश्न विचारल्यास गडकरी म्हणाले की,ते काय बोलतात आणि काय करतात हे त्यांनाच कळत नाही.

गडकरी यांनी उद्धव ठाकऱ्यांवरती कौतुकाचा वर्षाव करत म्हणाले की, बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकऱ्यांनी शिवसेनाचे उत्तम प्रकारे नेतृत्त्व सांभाळले आहे. त्यांना मराठी माणसांनबद्दल आपुलकी आहे. तसेच त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, ठाकऱ्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे बोलून गडकरींनी ठाकरेंवर टीका केली.

Related posts

NCBच्या कर्मचाऱ्यांवर ड्रग्स पेडलर्सचा हल्ला, NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे जखमी

News Desk

जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नायगाव व बिलोली तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियांतर्गत विविध कामांची पहाणी केली

News Desk

शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर भर!- अजित पवार

Aprna