HW News Marathi
मुंबई

सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरवाढीत घट

मुंबईइंधनाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल १० पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आज पेट्रोल ८७.८४ रुपये, तर डिझेल ७९.१३ रुपये मुंबईकरांना मोजावे लागणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पेट्रोलची किंमत २१ पैसे तर डिझेल किंमत १० पैशांनी घट झाली होती. त्यामळे सर्वसामान्य लोकंना थोडासा दिलासा मिळाला आहे.

तसेच आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत २४ पैशांनी घट झाली आणि डिझेलच्या किंमतीती १० पैशांनी घट करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात वाढ किंवा घट होणे हे काही सामान्य जनतेसाठी नवीन नाही. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ही आता नेहमीची बाब झाली आहे. इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने अक्षरश: कंबरडे मोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढउतार होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चेंबूर येथील आगीला दुतर्फा लावलेल्या गाड्या जबाबदार

News Desk

विलेपार्ले ते गोरेगावपर्यंत २० टक्के पाणी कपात

swarit

पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला

News Desk
राजकारण

मोदींच्या भेटीपासून तृप्ती देसाईंना रोखले

News Desk

पुणे | भूमाता ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई या केरळच्या शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबद्दल जाब विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी शिर्डीच्या दिशेने रवाना होण्यासाठी निघाल्या होत्या. परंतु पुणे पोलिसांनी त्यांनी तृप्ती देसाई यांना त्यांच्या पुण्यातील घरातून ताब्यात घेतले. मोदी हे आज (१९ ऑक्टोबर)ला साईबाबा समाधी शताब्दी उत्सवासाठी शिर्डीला भेट देणार आहेत.

देसाई यांना ताब्यात घेताना त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. “संविधानाने आंदोलन करणे आणि निषेध करण्याचा हक्क” दिला आहे. परंतु सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देसाई यांनी यावेळी केला आहे. शबरीमाला येथील अय्यपा मंदिरात प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांना मारहाण केली जाते. महिलांवर हात उचलणाऱ्यांवर कारई का केली जात नाही, असा सवाल यावेळी देसाई यांनी उपस्थित केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महिला मंदिरात का जाऊ शकत नाही? या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून गप्प का बसले? महिलांसाठी अच्छे दिन कधी येणार? असे अनेक सवाल देसाई यांनी प्रसार माध्यांशी बोलताना सरकारला विचारले आहेत.

तृप्ती देसाई यांनी काल (१८ ऑक्टोबर)ला अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र दिले होते. “मोदींची भेट न घेऊन दिल्यास त्यांचा ताफा अडवण्याचा इशारा” तृप्ती देसाई यांनी पत्रात म्हटले होते. पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे पोलिसांना यांची माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे. यानंतर देसाई यांना घराजवळूनच पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

Related posts

“हिंदू जन आक्रोश मोर्चा मोदी आणि शाहांच्या भूमिकेविरूद्ध”, संजय राऊतांचा बोचरी टीका

Aprna

प्रियांका चतुर्वेदी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड

News Desk

नेवाळी आंदोलनातील शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेणार | मुख्यमंत्री

News Desk