HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ८ दिवस कर्फ्यू वाढवू शकतात, संजय राऊतांचा इशारा

मुंबई | आजचा कर्फ्यू मुख्यमंत्री वाढवू शकतात. हा कर्फ्यू ८ दिवसांआधीच लागू व्हायला हवा होता. दरम्यान, राज्याची स्थिती पाहता मुख्यमंत्री हा कर्फ्यू वाढवू शकतात असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ही ७४ झाली आहे तर मुंबईत हा आकडा २६ वर गेला आहे. कोरोनाचे संकट हे जगावर आलेले मोठे संकट आहे त्यामुळे आपत्तीच्या काळात राजकारण विसरून काम केले पाहिजे. कोरोनाच्या विषयावरून कुणीही राजकारण करू नये. राजकारण करणाऱ्यांना क्वारंटाइन केले पाहिजे, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांत दिवसागणिक वाढतच आहेत. त्यामुळे राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अनेक निर्बंध उपाय केले जात आहेत. सरकारकडून कोरोनासंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. देशात जनता कर्फ्यूही घोषित केला आहे. त्याचे काटेकोरपणे देशातील जनता पालन करत आहे. तर सरकारच्या काही निर्णयांवर विरोधक नाराजी व्यक्त करत आहेत. त्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देशात कोरोनाचे इतके मोठे संकट आले असताना यावरुन राजकारण करणाऱ्यांनाच क्वारंटाइन केले पाहिजे, असा जोरदार टोला त्यांनी लगावला. कोरोनाच्या प्रश्नावर राजकारण करू नका. राजकीय मतभेद विसरून काम करा. आपत्तीच्या वेळेस राजकारण बाजूला ठेवून काम करायला हवे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंह का नाही बनले मुंबईचे पोलीस आयुक्त ?

News Desk

पुण्यात मुख्यमंत्र्यांची पारदर्शी सभा – सोशल मिडीयावर सभेबाबत उलटसुलट चर्चा

News Desk

कोरोना काळात तुम्ही अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलं ? मनसेचा राऊतांना सवाल

News Desk