HW News Marathi
मुंबई

गांजाची होते फ्री होम डिलिव्हर!

नवी मुंबई : अमली पदार्थ विक्रीचे जाळे खणून काढण्यासाठी पोलीस अहोरात्र प्रयत्नशील आहेत. मात्र गांजविक्रीचे अड्डे बंद होऊनही अजून गांजातस्करी पूर्णपणे रोखण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे गांजाची ‘फ्री होम डिलिव्हर’.

पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी गांजा तस्कर सध्या ऑन फोन आले आहेत. त्यामुळे अड्ड्यांवर जाऊन गांजा घेण्याऐवजी फोनवरूनच त्याची ऑर्डर दिली जाते. आणि काही क्षणांतच गांजा घरपोच केला जातो. त्यामुळे शहरातील गांजा तस्करी रोखण्यात पोलिसांना अद्याप पूर्ण यश आलेले नाही.

सारसोळे सेक्टर ६ मधील जय दुर्गामाता भाजी मंडईमध्ये दोन दिवसांपूर्वी काही तरूण गांजा ओढत बसले होते. पालिसांनी सगळीकडचे अड्डे बंद केले, तरीही घरपोच मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे गांजाचे दर वाढले असल्याचीही चर्चा तरूणांमध्ये होती.

शहरामध्ये यापूर्वी एपीएमसी परिसरामध्ये गांजा विक्री करणारा पप्या व तुंडा एमआयडीसीत फोनवरून आॅर्डर घेवून गांजा विक्री करत आहे. तुर्भे स्टेशनसमोर एक अड्डा अद्याप सुरू असून हनुमान नगरमध्ये बंद झालेला अड्डा पुन्हा सुरू झाला आहे, यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. नवी मुंबईसारखीच स्थिती राज्यातील अन्य महानगरांतही आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सोनिया गांधींच्या विरोधात केलेल्या विधनाबाबत मुंबईत उद्या अर्नब गोस्वामींची पुन्हा चौकशी होणार

News Desk

मुलीने पळून जावून प्रेमविवाह केला, तिकडे आई-वडिलांनी रेल्वेखाली जीव दिला

News Desk

मंत्रालयात ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यानी केला आत्महत्येचा प्रयत्न

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

‘मोदी सरकारच्या कार्यकाळात राममंदिर होणारच नाही’

News Desk

पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, पंतप्रधान कार्यालयाचे स्पष्टीकरण

News Desk

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरवाढीला ब्रेक; देशात मात्र…

News Desk