HW News Marathi
मुंबई

गोखले पूल दुर्घटनेला रेल्वे-पालिका नक्की जबाबदार कोण ?

मुंबई | अंधेरी रेल्वे स्टेशन जवळील गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या घटनेत एकूण ६ जण जखमी झाले आहेत. पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहतूक पुर्ववत येण्यसाठी बराच वेळ लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. गोखले पुलाचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गोखले पादचारी पूल हा ६० वर्ष जुना असल्याचे बोलले जाते. या दुर्घटनेनंतर मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दरम्यान रेल्वे प्रशासन आणि पालिका एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करत आहे. एका बाजूला कोसळलेला गोखले पूल हा मुंबई महापालिके अंतर्गत येतो, असे प्रशासनाने पत्रकाद्वारे म्हटले आहे. तर गोखले पुलाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला केला आहे.

कोसळलेला पूल हा मुंबई महापालिकेने बांधला आहे. त्याच्या देखभालीचे काम मुंबई महापालिकेने करणे आवश्यक होते’, असे म्हणत भाजपा खासदार किरीट सोमय्या महापौरावर निशाणा साधला आहे. राजकीय नेते मंडळी आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा जैसे थेच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संघर्ष यात्रा भाजपचं पेटंट आहे का ? – धनंजय मुंडे

News Desk

जातियवाद्यांना राज’वार’, एका दणक्यात सगळेच गपगार…! राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग

News Desk

रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी अंधारात

News Desk