HW News Marathi
मुंबई

खूशखबर ! मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई | तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांचा पाणीपुरवठाचा प्रश्न सुटला आहे. यामुळे १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबई शहरास होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे.

पालिकेने आज (१९ जुलै) स्थायी समितीच्या बैठकीत पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तलाव क्षेत्रात ५१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात ७ लाख ३० हजार दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला आहे. तलाव भरण्यासाठी अजून ७ लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दक्षिण मुंबईत झाड कोसळल्याने वाहतूकीचा खोळंबा

News Desk

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल ?

News Desk

दादरमध्ये दिवसाढवळ्या हत्या

News Desk