HW News Marathi
मुंबई

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू

मुंबई | निष्काळजी आणि चुकीच्या उपचारामुळे सर जे. जे. रुग्णालयाने आपल्या २२ महिन्यांच्या मुलाची हत्या केली, असा आरोप वाळीव पोलीस ठाण्यात कार्यरत वसीम शेख (३३) यांनी रविवारी केला. तशी तक्रार त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात केली. श्वानदंश झालेला नसताना रेबीजची लक्षणे या निव्वळ अंदाजावर उपचार केल्याचा दावा शेख कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात २६ मार्चच्या रात्री शेख आणि कुटुंबाने २२ महिन्यांच्या अझान याला जे.जे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. शेख यांनी ‘आमचे प्रतिनिधी’ आणि पोलीस ठाण्याकडे दिलेल्या जबाबानुसार, २८ मार्चला संध्याकाळी एक महिला शिकाऊ डॉक्टर अझानच्या थुंकीचा नमुना घेत असताना व्हेंटिलेटरवरील अझानच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला. साडेतीन तासांनी तातडीने रक्ताची व्यवस्था करा, असे सांगण्यात आले.

त्यानुसार रक्ताची जुळवाजुळव केली. महिला डॉक्टरने अझान पुढले जेमतेम दोन दिवस जगू शकेल, त्याची प्रकृती नाजूक आहे, असे सांगितले. ३० मार्चला मणक्यातील पाण्याचे आणि अन्य नमुने, आवश्यक ती कागदपत्रे हाती देत जे.जे.तील डॉक्टरांनी याची चाचणी बंगळूरु येथील निम्हंस रुग्णालयात करावी लागेल, असे सांगितले. तेथील चाचणीत अझानला रेबीज नसल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला.

रविवारी मध्यरात्री एक ते पहाटे चार यावेळेत वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने अझानचा व्हेंटिलेटर सहा ते सात वेळा बाजूला करून नैसर्गिकरीत्या उपचार करण्याचे प्रयत्न केले. अखेर चारच्या सुमारास त्यांनी अझानचा मृत्यू ओढवल्याचे आम्हाला कळवले, असे वसीम यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आदित्य ठाकरेंच्या आदेशाने सेना भवनमध्ये प्लास्टिक बंदी !

News Desk

पुण्यात चोविस तासाच दोन ठिकाणी गोळीबार

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन

Aprna
महाराष्ट्र

डॉ गंगाधर पानतावणेंचे स्मारक उभारणार | आठवले

News Desk

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिवंगत पद्मश्री डॉ गंगाधर पानतावणे यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मृती चिरंतन जोपासण्यासाठी औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

त्यासाठी दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांची कन्या नंदिता यांच्यासह मान्यवरांना घेऊन दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे फाउंडेशन नावाने ट्रस्ट स्थापन करण्याची सूचना करून दिवंगत पानतावणे यांच्या स्मारकासाठी औरंगाबाद मध्ये शासनाने जमीन द्यावी यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवलेंनी दिले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात रिपाइं आणि परिवर्तन साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित आदरांजली सभेत रामदास आठवले बोलत होते.

यावेळी विचारमंचावर भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, डॉ ऋषिकेश कांबळे, डॉ रोहिदास वाघमारे, सुहास सोनवणे, दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांच्या कन्या नंदिता अवसरमल तसेच केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले, भुपेश थुलकर, काकासाहेब खंबाळकर, माजी आमदार सुमंतराव गायकवाड, डॉ प्रीतिष जळगावकर, बि के बर्वे, आशाताई लांडगे, फुलाबाई सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गौतम सोनवणे यांनी केले.

दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनानुसार परिवर्तन साहित्य महामंडळ चालत होते. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते.त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले.त्यांचे वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभले. अनेक साहित्यिक विचारवंत पत्रकार संपादक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून शिवशक्ती भीमशक्ती युतीचा निर्णय आपण घेतला. दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांनी अस्मितादर्श नियतकालिकातून आंबेडकरी विचारांचा प्रचार केला आंबेडकरी विचारांचे साहित्यिक घडविले. मला ही त्यांचा आशीर्वाद मिळाला होता असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Related posts

राज्यात मेगा टेक्स्टाईल प्रकल्पला मिळाली मंजूर; उपमुख्यमंत्र्यांकडून माहिती

Aprna

“मग आम्ही का बिन काळजीचे आहोत का?”, अजित पवार विरोधकांवर भडकले  

News Desk

भर पावसात धैर्यशील मानेंचे दमदार भाषण

News Desk