HW News Marathi
मुंबई

न्याय व्यवस्थेच्या प्रतिमेला धक्का – अॅड. उज्ज्वल निकम

मुंबई – भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टतील चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. सुप्रीम कोर्टाचे कामकाज गेल्या दोन महिन्यापासून व्यवस्थित सुरू नसल्यामुळे लोकशाही धोक्या येण्याची चिंता न्यायमूर्तींनी व्यक्त केली.

या संदर्भात न्यायमूर्तींनी सरन्यायाधिशांना तक्रार करुन ही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे न्यायमूर्तींनी आपली हतबलता पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. यानंतर संपुर्ण देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

देशाच्या इतिहासात १२ जानेवारी हा दिवस हा काळ दिवस म्हणून ओळखला जाईल. या पत्रकार परिषदेत न्याय व्यवस्थेला धोका असल्याचे म्हटले आहे. यापुढे प्रत्येक सामान्य माणूस न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडे संशयाच्या नजरेतून पाहतील असे मत ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बालमोहन शाळेची गुरुपौर्णिमा 

swarit

भाजपच्या ३ प्रवक्त्यांना माध्यमांसमोर बोलण्यास बंदी

Gauri Tilekar

22 वर्षीय मुलीला आईनेच ढकलेल वेश्याव्यवसायात

News Desk