HW News Marathi
मुंबई

मंत्रालयातील सहाव्या माजल्यावर फायर अलार्म

मुंबई – मंत्रालायात शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास सहाव्या मजल्यावर अचानक फायर अलार्म वाजू लागल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची यावेळी चांगलीच पळापळ झाली. पण, कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर कळाले की, आग किंवा शॉट सर्किट झाले नसून तांत्रिक बिघाडामुळे फायर अलार्म झाला.

या आधी २०१२मध्ये मंत्रालायाच्या सहाव्या मजल्यावर आग लागली होती. तेव्हा आगीत अनेक महत्त्वाच्या फाईल जळाल्या होत्या. तसेच तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये देखील जळून खाक झाली होती. मुंबई आगीच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. पण, हा फायर अलार्म केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे कळातच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३ कोटींची लाच मागितल्या प्रकरणी आयकर विभागाचे उपायुक्त अटक

News Desk

एटीटी पार्सलच्या जंगलात खून: सुटकेसमध्ये अढळला मृतदेह

News Desk

मंकी हिलजवळ रेल्वे ट्रॅक खचला , रेल्वे वाहतुकीवर परिणाम

News Desk