HW News Marathi
मुंबई

केडीएमसीने रस्त्यावर खड्डे पडण्याचे खापर पावसावर फोडले

मुंबई | पाऊसाला सुरुवात झाली की, मुंबईत पुन्हा एकदा खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. या खड्ड्यांमुळे मुंबईत अनेकांचे जीव गेले असून या खड्ड्यांमुळे १५ मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागतो. रस्त्यात खड्डे पडण्यामागचे कारण केडीएमसीने शोधन काढले आहे. की, ‘सतत होणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे केडीएमसीने चौकात फलकाद्वारे नागरीक आणि वाहन चालकांना’ सांगितले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने महत्त्वाच्या चौकात ५० फलक लटकवले आहेत. या फलकाच्या माध्यमातून नागरिकांना खड्ड्यांपासून स्वत:चा जीव वाचविण्याचे आवाहनही केले आहे. रस्त्यावरील खड्डेमुळे अपघाती मृत्यूचे कारण होऊ शकत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या वक्त्वयाने सर्व सस्तरातून निषेध व्यक्त केला गेला.

पाटील यांच्या वादग्रस्त विधानाला ४८ तास देखील पूर्ण झाले नाही तर, केडीएमसीच्या रस्त्यावर खड्डे पडण्याचे खापर पावसावर फोडले आहे. या खड्ड्यांसाठी पालिकेने प्रशासन आणि कंत्राटदाराल जबाबदार न धरता पावसाला दोष दिला जात असल्याचा अजबप्रकार कल्याण-डोंबिवलीत उघडकीस आला आहे.

तसेच केडीएमसेच्या रस्त्यांची चाळ झाली असून पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण अधिक वाढले असून रस्ते अतिशय खराब झाले आहे. यामुळे वाहनचालक आणि दुचाकीस्वारांनी हळू व काळजीपुर्वक चालवावीत, असे फलक केडीएमसीने प्रमुख चौकात लावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा संपन्न

News Desk

शेतकरी मोर्चावरून विरोधक आक्रमक, सरकारवर कडक टीका

News Desk

पालकमंत्र्यांनी केले मिसाल मुंबईचे कौतुक

News Desk