HW News Marathi
मुंबई

लोकल अजूनही रुळांवर येईना!

मुंबई – जलप्रलयानंतर तिसऱ्या दिवशीही मुंबईची जीवनवाहिनी अद्याप पूर्णत: रुळावर आलेली नाही. तांत्रिक बिघाडमुळे कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद आहे. त्याचबरोबर सीएसटी ते कल्याण आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १५ मिनिटे, तर हार्बरची वाहतूक तब्बल एक तास उशिराने सुरू आहे.

मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री तुरळक पाऊस झाल्याचा परिणाम काही प्रमाणात रेल्वे सेवेवर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगळवारच्या पावसानंतर बुधवारी रेल्वेसेवा पूर्वपदावर आली होती. मात्र गुरुवारी पुन्हा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

बुधवारीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. प्रत्यक्षात तुरळक सरी वगळता, बुधवार कोरडा गेला. याच काळात शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

swarit

बाप्पाच्या दर्शनासाठी राणेंच्या घरी फडणवीस

News Desk

आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का; कार्यकर्त्याचा अजित पवारांना सवाल

News Desk
देश / विदेश

गोरखपूरमध्ये ४८ तासांत आणखी ३० बालकांचा मृत्यू

News Desk

गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ऑक्सिजन टँकअभावी ७० हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा ४८ तासांमध्ये ३० बालकांना जीव गमवावा लागला आहे. येथील बाबा राघवदास रुग्णालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात येणाऱ्या बाबा राघव दास रुग्णालय काही दिवसांपूर्वी ७० हून अधिक बालकांना जीव गमवावा लागला होता. या रुग्णालयात गेल्या ४८ तासांमध्ये ३० बालकांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर गेल्या ७२ तासांत रुग्णालयातील तब्बल ६१ बालकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सने ही आकडेवारी दिली आहे.

मेंदूचे विकार, न्युमोनिया, जंतू संसर्ग आणि नवजातांना भेडसावणाऱ्या विविध जीवघेण्या समस्यांनी या ३० तीन बालकांचा जीव घेतला आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णालयातील यंत्रणा कमी पडू लागली आहे. त्यामुळे सर्व बालकांवर उपचार करणे रुग्णालय प्रशासनाला शक्य झालेले नाही. २७, २८ आणि २९ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये मेंदू विकारावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डातील ११ बालकांनी प्राण गमावले. याच काळात एनएनआयसीयू आणि जनरल वॉर्डमधील प्रत्येकी २५ मुले दगावली आहेत.

उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रोगांचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रोगराई पसरुन मृतांचा आकडा वाढेल,अशी भीती व्यक्त होत आहे.

Related posts

तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त करण्याची राज्यपालांकडे शिफारस

News Desk

राजीव गांधी यांनी मुस्लिमांच्या ‘शरीयत’पुढे गुडघे टेकले व घटनेचा अपमान केला !

News Desk

हाथरस पीडितेचे फोटो आंदोलनांदरम्यान वापरल्याने स्वरा भास्कर,दिग्विजय सिंह यांना नोटीस

News Desk