HW News Marathi
मुंबई

मराठी उद्योजकांनो स्वत:च्या व्यवसायाचे मार्केटिंग करा- आशिष पेठे

मुंबई | लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स या संस्थेतर्फे नुकताच ३७ वा लक्ष्यसिद्धी सोहळा माटुंग्याच्या म्हैसूर असोशिएशन सभागृहात पार पडला. यासोहळ्यास वामन हरी पेठेचे भागीदार आशिष पेठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लक्ष्यवेध फाऊंडेशन आणि लक्ष्यवेध इंटरमिजिएट असे उद्योजकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना आशिष पेठे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे प्रमुख अतुल राजोळी, अतुल गोरे आणि विनय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

“१० वर्षे उद्योग केल्यानंतर सुद्धा तो उद्योग कोसळण्याची अनेक कारणे आहेत. पहिल्या १-२ वर्षांत जे उद्योग उभे राहिल्यानंतर कोसळतात त्यांना उत्पादनच मुळात कळलेलं नसतं. त्यामुळे ते उभे राहण्याच्या पूर्वीच कोसळतात. ४ ते ५ वर्षे कालावधीचा उद्योग कोसळतो कारण त्यांनी मार्केटींग स्ट्रॅटेजी नीट अवगत केलेली नसते वा त्याचा नीट वापर केलेला नसतो. त्याच्यापुढील जे उद्योगधंदे कोसळतात ते त्यांच्या मानसिकतेमुळे. आता आपण प्रस्थापित आहोत, आपल्याला मार्केटिंगची गरज नाही असे त्यांना वाटते आणि त्यांचा घात होतो. विपणन ही दीर्घकालीन आणि निरंतर प्रक्रिया आहे. ती तशीच चालू ठेवली पाहिजे. ऐन उमेदीच्या काळात तुम्ही व्यवसायात स्वत:ला झोकून द्या.

मात्र त्यानंतर व्यवसाय आणि कुटुंबाच्या वेळेत तुम्हांला समतोल साधता आला पाहिजे. व्यवसायात सतत संशोधन होणे आवश्यक आहे. जो व्यवसाय नाविन्याची कास धरुन स्वत:मध्ये बदल घडवितात ते स्पर्धेत टिकून राहतात”. अशा प्रकारचे उद्योजकीय बाळकडू आशिष पेठे यांनी उपस्थित उद्योजकांना दिले.”अतुल राजोळी ज्या प्रकारे मराठी उद्योजकांना घडवत आहेत ते खरोखरी वाखाणण्यासारखे आहे,” असे गौरवोदगार देखील त्यांनी यावेळी काढले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईकरांसाठी आजचा दिवस अपघाताचा ठरला

News Desk

नोकरच निघाला चोर

News Desk

तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का? : विखे पाटील

swarit
महाराष्ट्र

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे सारंगखेडा चेतक महोत्सव २०१८

News Desk

मुंबई | सलग दोन वर्षांच्या यशस्वी कार्यक्रमांनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि सारंगखेडा समितीतर्फे सारंगखेडा चेतक महोत्सव २०१८-१९ चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पारंपरिक वारसा असलेला हा प्राचीन अश्व महोत्सव साजरा करण्यात येत आहे. १२ डिसेंबर २०१८ ते ८ जानेवारी २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध प्रजातींचे आणि विविध प्रकारचे घोडे पाहायला मिळत आहेत आणि अश्वप्रेमींसाठी ही एक पर्वणी असणार आहे.

चेतक महोत्सव ही प्राचीन अश्वजत्रा असून त्याचे आता महिन्याभराच्या सोहळ्यात रूपांतर झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात तापी नदीच्या किनाऱ्यावरील आकर्षक गावांमध्ये अनेक वर्षांपासून ही जत्रा सुरू आहे. या महोत्सवात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात येथील घोडे या ठिकाणी पाहायला मिळतात. सारंगखेडा चेतक महोत्सवाच्या निमित्ताने नंदूरबारमध्ये वेगळे चैतन्य पाहायला मिळते. या ठिकाणी अश्व प्रदर्शन, अश्व शर्यती, त्याचप्रमाणे लावणी नृत्य, कवी संमेलनासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवाकडे जगभरातील पर्यटक आकर्षित होतात. या निमित्ताने या भागातील कला, संस्कृती आणि विविध पैलूंचे दर्शन घडवणे हा या महोत्सवाचा हेतू आहे. या महोत्सवाचा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर प्रचार करण्यासाठी आयोजकांनी ट्रिपएक्सओएक्सओ (TripXOXO) या ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मशी सहयोग केला आहे. या प्लॅटफॉर्मवरून जगभरातील पर्यटकांना सारंगखेडा महोत्सवातील विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी दोंडाईचाच्या नगराध्यक्ष नयनकुमार रावल ही उपस्थित होत्या. या वेळी महाराष्ट्राचे सन्माननीय पर्यटन आणि (रोहयो) मंत्री जयकुमार रावल म्हणाले, ” महाराष्ट्रातील या अश्व महोत्सवाच्या वारशाचा प्रसार करणे हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचा पर्यटन विभाग व एमटीडीसी हा महोत्सव जागतिक पटलावर पोहोचवेल, याची मला खात्री आहे. या महोत्सवामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील २५०० हून अधिक घोड्यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. पर्यटनाच्या नवनव्या संधी शोधण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही साहस पर्यटनावर भर देत आहोत. येत्या काळात नंदूरबार जिल्हा आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करेल आणि पर्यटन नकाशावर आपली छाप उमटवेल, असा मला विश्वास आहे.”

महाराष्ट्राचे सन्माननीय पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार म्हणाले, “स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सारंगखेडा महोत्सव हे एक आदर्श व्यासपीठ आहे. समृद्ध संस्कृती आणि वारसा साजरा करणाऱ्या या महोत्सवाचा एक भाग होताना मला अत्यंत आनंद होत आहे. नंदूरबार जिल्ह्यामध्ये पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्याची क्षमता आहे आणि सारंगखेडा चेतक महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणाकडे पर्यटकांना आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. अश्व कार्यक्रमांपासून खेळांपर्यंत आणि नृत्य सादरीकरणांचा समावेश असलेला हा महोत्सव अत्यंत भव्य स्वरुपात साजरा होत आहे.

.

Related posts

सोलापूरच्या पालकमंत्री पदी जितेंद्र आव्हाड यांची तात्काळ नियुक्ती

swarit

एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही – अजित पवार

News Desk

राष्ट्रीय पातळीवर मनसेशी युतीबाबत चंद्रकांत पाटील काय म्हणतात ?

News Desk