HW News Marathi
मुंबई

डबेवाल्यांच्या माध्यमातून प्रदुषण मुक्तीचा संदेश

मुंबई | मुंबईकरांसाठी वेळेत डब्बे पोहचवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे यांच्या हस्ते ई-सायकल वितरण सोहळा पार पडला. निबे मोटर्सच्या सहकार्याने या ई – सायकलची निर्मिती करण्यात आली आहे. या सायकलच्या माध्यमातून प्रदुषण मुक्त, पर्यावरण युक्त असा संदेश देण्यात येत आहे.

मुंबईत वाहतुकीमुळे जास्त प्रमाणात प्रदुषण निर्माण होत आहे. प्रदूषण , रोगराई पासून दूर रहाण्यासाठी डबेवाले पर्यावरण पुरक सायकलींचा वापर करतात. डबेवाल्यांना सायकलचे पॅडेल मारुन जो त्रास होतो त्यापासून त्यांची मुक्तता व्हावी. त्यांच्यासाठी ई-सायकल हा चांगला पर्यया असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातील प्लास्टिक बंदीचे कौतुक संपुर्ण देश भरातच नाही तर परदेशातून सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले, असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे. पुढे येत्या १० दिवसात अजून मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत. मुंबईच्या प्रत्येक सिंग्नलवर प्रदुषणवर नियंत्रण करणारी यंत्रा बसविण्यात येणार असल्याचे सुद्धा रामदास कदम यावेळी म्हणाले.

मुंबईत वाढते प्रदुषण लक्षात घेऊन इ सायकल देण्यात आल्या तर दुस-या बाजूला डब्बेवाल्यांना सायकलीचे पॅनडेल मारुन त्यांच्या पायाला होणा-या त्रासातून या सायकलीमुळे मुक्ती मिळणार आहे. ई सायकलला फक्त चार्जिंग करावी लागणार आहे.

यावेळी फक्त डबेवाल्यांनच नाही तर पोस्टमॅनला सुद्धा ई-सायकल देण्यात आल्या आहेत. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर , पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री दिवाकर रावते,आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत, उद्योग मंत्री सुभाष देसाई आदी नेते यावेळी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विसर्जन मिरवणुकी दरम्यान एकाचा मृत्यू

Gauri Tilekar

मालाडमध्ये सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग; 50 झोपड्या जळून खाक

Aprna

MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभाविपचा पाठिंबा

Gauri Tilekar
महाराष्ट्र

कर्जाला कंटाळून यवतमाळच्या शेतक-याची आत्महत्या

News Desk

यवतमाळ | महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात एका शेतकऱ्याने आपल्या आत्महत्येला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचे चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण अजून सुरु असताना यवतमाळ जिल्ह्यातील आणखी एका शेतक-यांने शनिवारी आत्महत्या केली.

उमरखेड तालुक्यामधील सावळेश्वर येथील माधव शंकर रावते या ७१ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने शनिवारी शेतातील पऱ्हाटीची चिता पेटवून त्यात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. शनिवारी घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस आली.

सावळेश्वर हे गाव अत्यंत दुर्गम भागात असल्याने दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस येताच शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली. माधव रावतेंकडे असलेल्या ४ एकर कोरवाहू शेतीत सततच्या नापिकीमुळे ते निराश होते. यावर्षी बोंडअळीमुळे त्यांना केवळ तीन क्विंटल कापूस झाला होता. त्यामुळे रावते आर्थिक संकटात होते. त्यांच्यावर स्टेट बँकेचे 60 हजारांचे कर्ज असल्याने गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या रावतेंनी शनिवारी आपली जीवन यात्रा संपवली.

 

Related posts

तेजस ठाकरे राजकारणात येणार ? वरूण सरदेसाई म्हणतात…

News Desk

ग्रामपंचायतीत सासू – सूनेत चुरशीची लढत! 

News Desk

ख्रिसमस अन् नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागणार; आज नवी नियमावली जाहीर होणार

Aprna