HW News Marathi
मुंबई

मनसे फेरीवाल्यांविरोधात पुन्हा आक्रमक, २० मार्चला फेरीवाल्याविरोधात आंदोलन

मुंबई | मनसेने फेरीवाला विरोधात २० मार्चला पुन्हा आंदोलनाचा इशाला दिला आहे. दोन महिन्यापुर्वी मुंबईतील प्रत्येक रस्त्याकडील फेरीवाल्यांचे मनसैनिकांनी त्यांच्या स्टाईलने खळ्ळखट्याक केले होते. शाळा, रुग्णालय आणि रेल्वे स्टेशन जवळील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मनसेनी आक्रमक पावेल उचलली होती. मग या ठिकाणांच्या सर्व फेरीवाल्यांचा भाजीपाला आणि फळ गाड्या उलट्या करुन नासधुस केली.

यानंतर पालिकेने ‘फेरीवाला क्षेत्र’ निश्चित केले होते. यानुसार १० ते २० फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आला होता. शाळा आणि रुग्णालय यांच्यापासून १०० मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. पालिकेने ‘फेरीवाला क्षेत्र’ ठरवण्यात आले होते. क्षेत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळील एम. बी. राऊत मार्ग आणि केळुस्कर मार्ग या दोन्ही रस्त्यावर पालिकेने ‘फेरीवाला क्षेत्र’निश्चित केले होते.

त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवून त्यांना फेरीवाल्या क्षेत्रातील रहिवाशांना आक्षेप किंवा सूचना असल्यास त्या जानू घ्याव्यात आणि पालिकेत सादर करावेत असे त्यांनी या बैठकीत सांगतले होते. काही दिवसासाठी नंतर पुन्हा शाळा, रुग्णालय आणि रेल्वे स्टेशन, फेरीवाले पुन्हा आहे तसेच बसायला लागले आहेत. म्हणून पुन्हा एकदा मनसेच्या वतीने २० मार्चला आंदोलन करण्यात येणार आहे. तर १८ मार्चला गुडीपाडव्याला राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत कोण कोणते राजकीय मुद्द्यावर राज ठाकरे बोलणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाशिवरात्री निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण

News Desk

पाऊले चालती पंढरीची वाट

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच, वडाळा आगाराला घेराव

News Desk
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेला अटक

News Desk

पुणे | कोरेगाव भिमा हिंसा प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेंला अखेर अटक करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा येथे हिंसा भडकवल्याचा एकबोटेंवर आरोप आहे. समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना सुप्रीम कोर्टाने 14 मार्चपर्यंत एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.

त्याआधी मुंबई हायकोर्ट व पुणे सत्र न्यायालयाने एकबोटे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 20 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान एकबोटेंना 14 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आज त्यावर सुनावणी झाली. मात्र, आज कोर्टाने त्यांना जामीन देता येणार नाही असे स्पष्ट बजावले.

दरम्यान, पुणे पोलिसांनी मंगळवारीच सुप्रीम कोर्टात आपला अहवाल सादर केला. यात मिलिंद एकबोटे यांनी कोरेगाव भिमा प्रकरणात काही लोकांना कसे भडकवले याचे पुरावे सादर करण्यात आले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन नाकारला.

Related posts

मोफत लसीकरणाच्या घोषणेवर काँग्रेसची नाराजी, राष्ट्रवादी-सेनेला थोरातांनी सुनावलं

News Desk

गृह विभागाकधून सौरभ त्रिपाठींच्या निलंबनाचे आदेश

Aprna

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ! राज्यात आजपासून डिजिटल शैक्षणिक वर्षाला सुरुवात

News Desk