HW News Marathi
मुंबई

मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी 

मुंबई | निवडणुका जवळ आल्या असताना भाजप आणि शिवसेने अयोध्येमधील राम मंदिरच्या मुद्द्यावर घोषणाबाजी करत आहेत. आणि मुंबईत गणेशोत्सव देखील जवळ आल्यामुळे राजकारणाला जोरदार सुरुवात झालेली दिसून येत आहे. गणेशोत्सव वादावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मनसेने शिवसेना भवनाबाहेर पोस्टर लावले आहेत. “अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरुर बांधा…पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बांधा,” अशा आशयाचे हे पोस्टर आहेत.
गणेश उत्सवादरम्यान रस्त्यावर मंडप घालण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहेत. यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मुंबई महापालिकेत सत्ता असूनही शिवसेना त्याबाबत मौन बाळगत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच महिन्यात अयोध्याला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र तुम्हाला अयोध्याला जायचं असेल तर जा, पण आधी गणेशोत्सवासाठी आवश्यक त्या परवानग्या तर आम्हाला द्या, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. त्यामुळे होर्डिंग लावून मनसे शिवसेनेला लक्ष्य करत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महानगरपालिका २३ पुलांखाली उभी करणार उद्याने 

Gauri Tilekar

विज्ञानाच्या पुरस्कारासाठी ते उतरले रस्त्यांवर!

News Desk

पंतप्रधान मोदी यांचे मावळे म्हणून निवडणुकीला सामोरे जा

News Desk
महाराष्ट्र

१५ ऑगस्टपासून मराठा समाजाचे ‘अन्नत्याग’ आंदोलन

swarit

मुंबई | मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून ‘अन्नत्याग आंदोलन’ करणार करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. यापुढे मराठा समजा रस्त्यावर आंदोलन न करण्याची मोठी घोषणा मराठा क्रांती समितीने केली.९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु या बंदला हिंसक वळण लागले. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती समितीने औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद बोलवली होती.

मराठा समाज आणि आंदोलनाला बदना करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चा समितीने यावेळी केला. तसेच मराठा तरुणांवर जे गुन्हे दाखल केले आहेत. ते सर्व गुन्हे १५ ऑगस्टपर्यंत सरकारने मागे घ्यावे, असा इशारा देखील समितीने यावेळी दिला आहे.

वळूज एमआयडीसीतील ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे. त्या कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक करावे, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. याआधी मराठा आंदोलकांनी तोडफोड केली नाही, मग आताच का असे झाले? तसेच या तोडफोडीची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली.

महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

मराठा आंदोलकांनी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. पुण्यातील चांदणी चौकातही जमाव हिंसक झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरू केला. चांदणी चौकातील परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. औरंगाबादमध्ये ही आंदोलकांनी २ खासगी वाहने पेटवली. पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आश्रूधुराचा वापर करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.

 

Related posts

मोठी बातमी ! पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी दिला मुख्यमंत्र्यांकडे अखेर राजीनामा

News Desk

वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

रात्री कोरोना असतो का? मनसेच्या प्रश्नाला शिवसेनेने दिले उत्तर

News Desk