HW News Marathi
मुंबई

मोनो रेल ऑगस्टमध्ये धावणार

मुंबई । आठ महिन्यापासून कारशेड मध्ये आराम करत असलेल्या मोनो रेलचा आराम आता संपला आहे. ऑगस्टमध्ये मोनो रेल पुन्हा रुळांवर धावणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मोनो रेल्वेचा बंद असलेला चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू करण्याच्या ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चा विचार आहे. पण यावेळी प्रवाशांच्या खिश्याला कात्री लागणार आहे. प्रवासातही अधिक पैसे मोजावे लागणार आहे. कारण मार्गिका सुरू करण्याबरोबरच ‘एमएमआरडीए’ने भाडेवाढ देखील केली आहे.

तसेच पहिला टप्पा कार्यान्वित होत असला तरी अपुऱ्या मोनो गाड्यांमुळे वडाळा ते संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) हा दुसरा टप्पा इतक्यात सुरू होणार नाही. चेंबूर ते वडाळा हा मोनोचा पहिला टप्पा लवकरच पुन्हा कार्यान्वित होणार असून कित्येक दिवस ही संपूर्ण मार्गिका बंद आहे. त्यामुळे या मार्गावर मोनोची ‘ट्रायल रन’ करणार असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी दिली. त्यामुळे १५ ऑगस्टनंतर हा मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर स्थानकात मोनोला आग लागल्यानंतर पहिल्या टप्प्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

मोनो वाहतूक सूरू करण्याचा विचार एमएमआरडीए प्रशासनाने केला असला तरी पगार न मिळाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे गाड्या चालविण्यासाठी आणि इतर नियोजनासाठी प्रशासनाकडे अपुरे कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी कंपनीशी बोलणी केल्याचे खंडारे यांनी सांगितले. तसेच वाहतूक पुन्हा सुरू होणार असली तरी प्रवाशांना त्यासाठी अधिक भाडे मोजावे लागणार आहेत. कारण जानेवारी महिन्यामध्ये भाडेवाढ करण्याच्या करारावर एमएमआरडीए प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा दुप्पट भाडे मोजावा लागणार आहे. यापूर्वी मोनोच्या प्रवाशाच्या तिकीटांचे दर ५ ते १९ रुपयांच्या घरात होते. मात्र आता हे दर १० ते ४० रुपये असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीएसटीनंतर लवकरच नवा कायदा

News Desk

यंदा गणेशोत्सव मंडळांना पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक

News Desk

दिग्दर्शक निशिकांत कामत अजूनही जिवंत… रितेश देशमुख यांनी केले स्पष्ट

swarit