HW News Marathi
मुंबई

मोनोरेलने गाठला १ सप्टेंबरचा मुहूर्त

मुंबई | गेल्या तब्बल ९ महिन्यापासून बंद असलेली मोनोरेल अखेर पुन्हा रुळावर धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अनेक अडचणींना पार करून १ सप्टेंबरचा मुहूर्त गाठला आहे. १ सप्टेंबर पासून मोनोरेलचा पहिला टप्पा सुरु करण्यात येणार आहे. मोनोचा पहिल्या टप्पा म्हणजेच चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान मोनोरेलच्या ट्रायल रन सुरु आहेत.

गेल्या नऊ महिन्यांपासून आगीच्या दुर्घटनेमुळे यार्डात बंद पडलेल्या मोनोरेलमुळे एमएमआरडीएला रोज ७ ते ८ लाखाचे नुकसान सहन करावे लागत आहे. देशातील पहिला मोनो प्रकल्प सुरक्षेच्या कारणामुळे बंद असल्याने एमएमआरडीएला मोठ्या प्रमाणावर टिकांना सामोरे जावे लागले. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिवाळीनिमित्ताने मेगाब्लॉक रद्द

News Desk

या अधिकाऱ्यांना POKमध्ये पाठवा !

News Desk

 ‘तो आहे देवेंद्र आमचा’ भाजपचं नवं प्रचार गाणं

swarit
महाराष्ट्र

मुंढेंविरोधात अविश्वास ठराव, नाशिकरांचे मुंढेंना समर्थन

Gauri Tilekar

नाशिक | नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध करवाढीचा मुद्दा पुढे करत भाजपमधील काही नगरसेवक अविश्वासाचा ठराव आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या अविश्वाच्या ठरावा विरोद्धात आता नाशिककर एकवटले असून याबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाशिककर तुकाराम मुंढे यांच्या खंबीरपणाने पाठीशी असून सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या अविश्वासाच्या ठरावाला तीव्र विरोध दर्शवित आहेत.

मुंढेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर #wesupportmundhe #nashiksupportsmundhe असे हॅशटॅग्स सुरु आहेत. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देखील तरुणाई आपला संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. सत्ताधारी पक्ष आणि नगरसेवकांमध्ये तुकाराम मुंढेंबद्दल नाराजी असल्याचे कळत आहे.

नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, पुणे येथील त्यांच्या तडफदार कामाची सामान्य नागरिकांकडून प्रशंसा झाली परंतु नगरसेवक आणि सत्ताधारी पक्ष कायमच यांच्या विरोधात राहिले आहे. परिणामी प्रत्येक ठिकाणाहून त्यांची बदली होत राहिली. ‘मुंढे आम्हाला वेळ देत नाहीत, योग्य तो मान देत नाहीत, उद्धटपणे बोलतात’, अशा नगरसेवकांच्या तक्रारी होत्या. मात्र सामान्य जनता आणि तरुणाईमध्ये मुंढे कायम त्यांच्या कार्यतत्परता आणि प्रामाणिकपणामुळे लोकप्रिय राहिले.

Related posts

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आक्रमक, भाजपवर दबाव

News Desk

जयसिंगराव गायकवाड उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करत हाती घड्याळ बांधणार

News Desk

शरद पवारांचा ‘तो’ अंदाज खरा ठरला, वर्तवलं होतं निकालाचं भाकित

News Desk