HW News Marathi
मुंबई

मुंबई विमानतळावर मेगाब्लॉक, तिकीट दरावर होणार परिणाम

मुंबई | मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आजपासून म्हणजेच ७ फेब्रुवारी ते ३० मार्चंपर्यंत हे काम चालणार असून या कामामुळे धावपट्टी ६ तासांसाठी बंद राहणार आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असे तीन दिवस काम केले जाणार आहे. या दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानांचे उड्डाण तसेच लँडिंग होणार नाही. परिणामी तिकीट दरात ५० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. दरम्यान, २१ मार्चनंतर वाहतूक पूर्ववत होईल.

मुंबई विमानतळ हे सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. दिवसाचे सहा तास वाहतूक बंद राहणार असल्याने दिवसभरात वाहतूक अत्यंत कमी होणार आहे. याच कारणामुळे तिकीटदरात वाढ होईल. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकमेकांना भेदणाऱ्या दोन धावपट्ट्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन धावपट्ट्या जिथे जुळतात, त्याच भागात दुरुस्तीचे काम होणार आहे. यामुळे दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवाव्या लागणार आहेत.

मुंबई विमानतळावर दर तासाला ४६ विमाने ये-जा करतात. म्हणजेच एका दिवसात २७६ विमानांवर दुरुस्तीचा परिणाम होणार आहे. मुंबईच्या दुसऱ्या विमानतळाच्या जलद निर्मितीची मागणी पुन्हा होऊ लागली आहे. मुंबईसाठी दुसरे विमानतळ व्हावे ही मागणी २००० सालापासून होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळमध्ये पेट्रोलपंपच्या बाजूला आग; अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल

Aprna

धारावीच्या पुनर्विकासावरुन बीएमसी-राज्य सरकारमध्ये वाद

swarit

मुंबईकरांनो, काळजी घ्या! पावसाचा वाढला जोर, ३ दिवस धोक्याचे

News Desk