HW News Marathi
मुंबई

अंधेरी पूल दुर्घटनेसाठी पालिका जबाबदार | मुंबई हायकोर्ट

मुंबई | मुंबईकरांच्या सुविधांशी संबंधित अपघातांसाठी महानगरपालिकाच जबाबदार राहणार असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. तसेच पालिकेने आपली जबाबदारी झटकू नये, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने पालिकेचे कान टोचले. तसेच प्रत्येक वेळी पालिका पूल पडण्याची वाट का पाहते, पालिकेने सर्व पुलांच याआधी ऑडिट का केले नाही. असा सवाल मुंबई हायकोर्टाने पालिकेला केला आहे. तसेच पालिकेचे नगरसेवक आणि वॉर्ड अधिकारी यांना कधीच जबाबदार का धरले जात नाही, असा थेट प्रश्न हायकोर्टाने करुन पालिकेला कोडीत पकडण्याच प्रयत्न केला आहे.

या दुर्घटनेनंतर गोखले पूल रेल्वे की पालिका कोणाच्या अंतर्गत येतो. यावरुन राजकारण पेटताना दिसले होते. गोखले पूल हा मुंबई महापालिके अंतर्गत येतो, असे प्रशासनाने पत्रकाद्वारे म्हटले आहे. तर गोखले पुलाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

अंधेरी पूल दुर्घटना

अंधेरी स्टेशन जवळील गोखले पुलाचा काहीसा भाग मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पूल दुर्घटनेत एकूण पाच जण जखमी झाले होत. गोखले पूल हा जवळपास ६० वर्षे जुना असल्याचे बोलले जात आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनच्या ८ आणि ९ या प्लॅटफॉर्मवरील ही घटना आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाभिमानीचे नेते नारायण राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी विधीमंडळात

Adil

मनसेकडून नाणार प्रकरणी खळ्ळ खट्याक

News Desk

रविवारी बाहेर जाताय… सावधान !

News Desk