HW News Marathi
मुंबई

नालेसफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष, धारावीतील शेटवाडी नाला गाळ कच-याने तुडुंब

मुंबई : धारावीतील शेटवाडी नाला गाळाने व कच-याने तुडुंब भरला आहे. या नाल्यातील पाणी गेल्या अनेक वर्षांपासून नाल्याच्या आसपास असलेल्या घरांमध्ये शिरते. त्यामुळे परिसरातील नागरीक प्रचंड त्रस्त आहेत. महापालिकेने सालाबादाप्रमाणे यंदाही हलगर्जीपणा केल्यामुळे विभागात अद्याप नालेसफाई झालेली नाही. त्यामुळे धारावीचा शेटवाडी नाला यंदाही पावसाळ्यात ओसंडून वाहण्याची शक्यता विभागातील नागरीक व्यक्त करत आहेत.

सध्या हा नाला भरल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे विभागात डास प्रचंड प्रमाणात वाढले असून लोकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिक नगरसेवक मात्र नाल्याची सफाई न करता रस्त्यांची डागडुजी आणि इतर बाबींना विषेश महत्व देत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी हा नाला उशीरा साफ केला जातो त्यामुळे पावसाळ्या दरम्यान सुरु झालेल्या नालेसफाईत हा नाला पुर्णपणे स्वच्छ होत नसल्याचे स्थानिक नागरीक सांगतात.

नाल्यात परिसरात असलेल्या कारखाण्यांचे सांडपाणी तसेच शौचालायाचे घाण देखील सोडली जाते. त्यामुळे या नाल्यावरुन जाताना लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या नाल्याजवळ रहाणा-या लोकांनी गेल्या अनेक वर्षात आपल्या घराच्या खिडक्या उघडलेल्या नाहीत. दरवर्षी नालेसफाई एप्रिल महिन्यात सुरु होते परंतु यंदा मे चा पहिला आठवड संपला तरीही अद्याप या नाल्याची स्वच्छता झाल्याचे दिसत नाही. पालिका अधिका-यांन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेटवाडी नाल्याकडे लक्ष देऊन स्वच्छता करावी अशी मागणी नागरीक करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी ठणठणीत, प्रजा फाउंडेशनचा अहवाल

Gauri Tilekar

गुजरात, महाराष्ट्रात स्वाइन फ्लुचा कहर, आठशे लोकांचा बळी

News Desk

मनसेच्याच कार्यकर्त्यांच्या दुकानांवर इंग्रजी पाट्या

News Desk
क्रीडा

आम्हाला बीसीसीआयने सदस्यत्व द्यावे, तेलंगना क्रिकेट असोसिएशनची मागणी

News Desk

मुंबई : तेलंगना क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आम्हाला बीसीसीआयने सदस्यत्व द्यावे अशी मागणी केली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करुन असोसिएशनच्या पदाधिका-यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भातील निर्णय बीसीसीआयकडे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याची माहिती देखील यावेळी पत्रकारांशी बोलताना तेलंगना क्रिकेट असोसिएशन कडून देण्यात आली आहे. आंध्रप्रदेश मधून 2014 साली तेलंगनाची निर्मिती झाली. त्यानंतर तेलंगना वेगळे राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेलंगनातील 30 जिल्ह्यात विविध वयोगटातील जवळपास 12 हजार मुले- मुली क्रिकेट खेळ खेळतात. अशी माहिती तेलंगना क्रिकेट असोसिएशन चे महासचिव धरम रेड्डी यांनी दिली.

रेड्डी पुढे म्हणाले की, हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन फक्त हैद्राबाद शहरात राहणा-या क्रिकेटर्स करीता आहे. तीन वर्षा पूर्वीच टीसीए ने बीसीसीआयला कळविले होते की, तेलंगना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूना राष्ट्रीयस्तरावर आपले कसब दाखविण्याची संधी द्यावी. टीसीएने आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सैय्यद आबिदअली यांच्या सहित समकक्ष खेळाडूना प्रशिक्षक म्हणून नवयुवक आणि युवतीना प्रशिक्षण दिलेले आहे.

तेलंगना सरकारने एल. बी. स्टेडियम आणि अन्य खेळांची मैदाने क्रिकेट खेळण्यास उपलब्ध करुन दिलेली आहेत. मागील तीन वर्षा पासून बीसीसीआयच्या नियमानुसार 14 हजार सामने खेळविण्यात आलेले आहेत. 29 लीग सामनेही खेळविण्यात आलेले आहेत. या पत्रकार परिषदेत टीसीएचे उपाध्यक्ष हरिनाथ रेड्डी, सहसचिव श्रीनिवास घारगे उपस्थित होते.

Related posts

आचरेकर सरांनी मला जगायला शिकविले !

News Desk

क्रिकेटर आयुष झिमरेने घेतली आठवलेंची भेट

News Desk

अर्जुन पुरस्कार विजेत्यावर आईस्क्रीम विकण्याची वेळ

Gauri Tilekar