HW News Marathi
देश / विदेश

आठवीच्या पुस्तकात बाळ गंगाधर टिळक दहशवादाचे जनक

नवी दिल्ली : राज्यस्थानमधील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स पुस्तकात बाळ गंगाधर टिळक हे दहशवादाचे जनक असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे. या पुस्तकामध्ये टिळकांबदल जे छापले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोड फुटले असून महाराष्ट्रात या प्रकरणाचे किती तीव्र पडसाद पडतील हे येता काळाच सांगू शकेल. या प्रकरणा बदल राजस्थान सरकार काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

धड्यात टिळकांबदल नेमके काय म्हटले

‘अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यामध्ये टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख करण्यात आला आहे.’ टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. राज्यस्थानमधील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरेन्स पुस्तकात असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात, असे या धड्यात म्हटले आहे. शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे देखील या धड्यात म्हटले गेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे अल्पेश ठाकूर यांचा पैसे उडवितानाचा व्हिडिओ व्हायरल

News Desk

राष्ट्रगीताचा अवमान कराल तर ३ वर्ष शिक्षा  

News Desk

उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव

News Desk