HW News Marathi
मुंबई

अक्षयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

मुंबई | बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला ‘रुस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.प्रसिद्ध नानावटी केसवर आधारित रुस्तम या चित्रपटात अक्षय कुमारने नेव्ही ऑफिसर रुस्तम पावरी ही भूमिका साकारली होती. रुस्तममध्ये अक्षयसोबत एलियाना डिक्रुज, इशा गुप्ता, उषा नाडकर्णी हे कलाकार झळकले होते.

गेल्या काही वर्षांत अक्षय कुमारचे हॉलिडे, बेबी, स्पेशल 26, एअरलिफ्ट यासारखे चित्रपट प्रचंड गाजले. अक्षय कुमारचं सोशल मीडियावरील फॅन फॉलोविंगही प्रचंड असून त्याचे अनेक सिनेमे शंभर कोटींच्या क्लबमध्ये गेले आहेत.

2011 मध्ये त्याचा ‘पद्मश्री’ने गौरव करण्यात आला होता. दरम्यान, अक्षयकुमारने या सन्मानाविषयी सर्वांचे आभार मानले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून अक्षयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

होळीच्या उत्सवात ‘पब्जी गेम’च्या प्रतिमेचे दहन

News Desk

विकासकांचा ३४० ते ४२० चौरस फुटांच्या घरांकडे ओढा

News Desk

मनसेच्याच कार्यकर्त्यांच्या दुकानांवर इंग्रजी पाट्या

News Desk
मनोरंजन

विनोद खन्ना यांची प्रकृती खालावली

News Desk

मुंबई- शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची प्रकृती सध्या खूपच नाजूक झाली आहे. इतकच काय तर त्यांना आता ओळखणंही कठीण झालं आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे रूग्णालयातील फोटोस व्हायरल झाले असून आजारपणामुळं विनोद खन्नांची झालेली अवस्था पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

मागील आठवड्यात विनोद खन्ना यांना चर्नी रो़डच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. खन्ना यांना मूत्रपिंडाचाकॅन्सर असल्याचं तपासणीत समोर आल्याचं सूत्रांकडून समजतं. याविषयी अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, त्यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होतअसून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती त्यांचा मुलगा राहुल यानं दिली आहे.

Related posts

विरानुष्का नंतर या सेलिब्रेटी जोडप्याची आहे चर्चा; खान कन्येचं कुणावर आलं दिल ?

swarit

‘नाळ’ची प्रेक्षकांना भुरळ, पहिल्याच आठवड्यात १४ कोटींची कमाई

News Desk

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील `हे मृत्युंजय’ नाटकाचा मुहूर्त

News Desk