HW News Marathi
मुंबई

नवी मुंबईत कुत्रे होतायत निळे!

नवी मुंबई – तुम्ही आतापर्यंत तांबडे, काळे, पांढरे अशा अनेक रंगाचे कुत्रे पाहिले असतील, पण निळे कुत्रे तुमच्या पाहण्यात कधीच आले नसतील. नवी मुंबईत मात्र हल्ली निळ्याशार रंगाचे कुत्रे पाहायला मिळत आहेत. पण हा निळा रंग धोक्याची सूचना देणारा आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास येथील मनुष्य जीवन धोक्यात येऊ शकते.
नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक वसाहतीत सध्या असे निळे पडलेले भटके कुत्रे दिसत आहेत. मात्र हा काही चमत्कार नसून, येथील कंपन्यांनी दूषित पाणी जवळच्या नदी, ओढ्यांत सोडल्याचा तो परिणाम आहे. खरंतर रासायनिक कंपन्यांना सांडपाणी नदीत सोडताना त्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. पण शासनाचा हा नियम धाब्यावर बसवून येथील कंपन्या जसेच्या तसे रासायनिक पाणी नदी नाल्यांत सोडत आहेत. त्याचा विपरीत परिणाम येथील जीव साखळीवर होत आहे.
दूषित पाण्यामुळे नदीतील जीव तर धोक्यात आले आहेतच. पण त्याबरोबरच नदी ओढ्यात खाणे शोधत जाणारे कुत्रे देखील त्यामुळे निळे पडत आहेत. कुत्रांच्या आरोग्यवर या दूषित पाण्याचा परिणाम होत आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच या दूषित पाण्याचा येथील मानवी आरोग्यावरही वाईट परिणाम होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी वर्तविली आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई विद्यापीठाचे उत्कृष्ट महाविद्यालये, आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

News Desk

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

News Desk

‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, सामनातून भाजपावर टीका

News Desk
देश / विदेश

अॅम्बी व्हॅलीवर बोली लावण्यास सुरुवा

News Desk

मुंबई : गुंतवणूदारांचे पैसे बुडविल्याप्रकरणी अनेक महिने तुरुंगात डांबण्यात आलेले सहारा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुब्रातो रॉय यांना जोरदार हादरा बसला आहे. कारण त्यांच्या लोणावळा येथील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. ६७ हजार ६२१ एकरवरीलया संपूर्ण मालमत्तेची किंमत तब्बल ३४ हजार कोटी असून तसेच लिलावाची बोली ३७, ३९२ कोटीपासून सुरू झाली आहे.

मुंबई उच्च न्यायलयाने आजच अॅम्बी व्हॅलीसाठी लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली. लिलावाला स्थगिती मागणारी याचिकागुरुवारी फेटाळून लावण्यात आली होती. दरम्यान, मॉरिशसमधील रॉयल पार्टनर्स इन्वेस्टमेंट फंड या कंपनीने अॅम्बी व्हॅलीमध्ये १० हजार ७०० कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली होती. तर सहारा समुहाच्या मते अॅम्बी व्हॅलीचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

पंतप्रधान मोदी, संघ का वाटतात दहशतवादी

News Desk

रामाचे दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे, माणसं जगवा!

News Desk

गोरखा जनमुक्तीदेखील एनडीएमधून बाहेर पडणार, भाजपला आणखी एक धक्का

News Desk