HW News Marathi
मुंबई

पती पत्नीसह नऊ जणांना अटक, घरगुती वादात केली कारवाई

उल्हासनगर | पोलिसांसमोर एकमेकांवर चाकू आणि तलवारी उगारणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या विकास शिरसाठ आणि नेहा शिरसाठ या पती-पत्नीमध्ये वाद सुरु होता वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावले होते. महिला तक्रार निवारण कक्षात दोघांची बोलणी सुरु असतानाच अचानक पुन्हा वाद उफळला.

दोन्ही पती-पत्नी सोबत आलेले आठ ते दहा जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. इतक्यावरच न थांबता त्यांनी चक्क एकमेकांवर चाकू आणि तलवारीही उगारल्या. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी दोन्ही गटांच्या नऊ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन चाकू आणि तीन तलवारी जप्त केल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओला – उबेर विरोधात टॅक्सी चालकांचा वांद्रे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

News Desk

घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील मोबाईल शोरुमला आग

News Desk

पनवेलमध्ये वैदू नगर झोपडपट्टीला आग

News Desk