HW News Marathi
मुंबई

राष्ट्रध्वज पदपथावर, ‘मुंबईत तिरंगा उठावो अभियान’

मुंबई | काल स्वातंत्र्य दिन देशात उत्साहात साजरी करण्यात आला. एका दिवसासाठी का होईना पण प्रत्येकाचे भारत मातेवरचे प्रेम उसळून आले. अनेक ठिकाणी सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं तसेच अनेक देश प्रेमींनी भारताचा झेंडा आपल्या छातीवर, गाडीवर, हातात अभिमानाने बाळगला होता. पण जसा दिवस सरत गेला तसं स्वातंत्र्य दिवसाचे प्रेम कमी होत गेले. छातीवरचे झेंडे खाली रस्त्यावर पडले. अभिमानाने लावलेला झेंडा संध्याकाळी मुंबईच्या धावपळीच्या जीवनात पायाखाली येतो पण उचलून बाजूला ठेवण्याचे कष्ट खूप कमी नागरिक घेतात.

म्हणून असे काही तरी एक पाऊल पुढे येतं राष्ट्राभिमानी समितीच्या व ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या “तिरंगा उठवो मोहिमे” अंतर्गत पदपथावर पडलेले राष्ट्रध्वज उचलणं तसेच ते नजरेसमोर दिसूनही काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात व उचलण्याची त्यांची मानसिकता नसते कारण त्यांची राष्ट्रभक्ती ही फक्त स्वतंत्रता दिनी व प्रजासत्ताक दिनीच जागृत होत असते अश्यावेळी ते उचलण्याचे कार्य गेली १३ वर्षे करत असून ह्यावर्षी ह्या मोहिमेला १४ वर्षे पूर्ण झाली. तरी गेल्या १३ वर्षात हे राष्ट्रध्वज पदपथावर पडण्याची संख्या फारच कमी झाली आहे ही राष्ट्राभिमानी समितीच्या व ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्या मोहिमेसाठी समाधानाची बाब आहे.

सुरुवातीला माहीम, दादर परिसरात दोन वर्षात तब्बल ८लाखाच्या वर राष्ट्रध्वज मिळाले आणि ह्यावर्षी सकाळपासून आम्ही माहीम ते सिद्धिविनायक फिरलो पण अवघे ७० ते ८० राष्ट्रध्वज आम्हाला मिळाले. आज ह्या मोहिमेमुळे जे काही परिवर्तन झाले ते आमच्या दृष्टीने जिकल्याची भावना व आनंदाची भावना आहे. आजच्या कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष प्रशांत पळ, मार्गदर्शक विलास फडके,उपाध्यक्ष रुपेश शिगवण, सेक्रेटरी मनोज मिसाळ , राज दुदवडकर, वनिता चेटियार, भास्कर देवडिगा, योगेश सारंगुल, अजय पोतदार सहभागी झाले होते. असे प्रशांत पळ यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या इशाराऱ्यावर सरकार पोरकटपणे वागत आहे | जयंत पाटील

News Desk

डहाणूत ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली

News Desk

Breaking News | वरळीतील साधना मिल कम्पाउंडला भीषण आग

News Desk
देश / विदेश

मिशन गगनयानमुळे रोजगार निर्मितीत मोठी वाढ 

swarit

श्रीहरीकोटा | “२०२२ साली अंतराळात भारताचा तिरंगा फडकेल” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी ‘मिशन गगनयान’ या मोहिमेची घोषणा केली. भारतीय अंतराळवीराला स्वबळावर अंतराळात घेऊन जाणे हे इस्रोचे लक्ष्य आहे. पण त्याचबरोबर ‘या मोहिमेद्वारे देशभरात १५ हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे’, अशी माहितीदेखील इस्रोचे अध्यक्ष के. शिवन म्हणाले.

इस्रोच्या या मोहिमेमुळे देशातील रोजगार निर्मितीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. इस्रोची ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहिम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. ‘२०२२ सालापर्यंत इस्रो आपले अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे’, असे इस्त्रोचे अध्यक्ष के.शिवन यांनी सांगितले.

Related posts

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने ओळखला जाणार!

Jui Jadhav

पंतप्रधानांचे लोकांना पीएम-केअर्स फंडात योगदान करण्याचे आवाहन

swarit

धर्माच्या रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या

News Desk