HW News Marathi
मुंबई

मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ओव्हरफ्लो

मुंबई | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणारे चारही धरणे भरली आहेत. गेल्या १५ दिवसापासून सुरू असलेल्या मुंबईसह धरणे परिसरात दमदार पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांची तहान भागविणारे धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. तुळशी, मोडकसागर आणि विहार ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. आणि यानंतर आज पहाटे तानसा धरणेही १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी ९ व १० क्रमांकाचे दोन दरवाजे उघडण्यात आल आहेत.

सोमवारी मोडक सागर धरण १०० टक्के भरल्यानंतर त्याचेही २ दरवाजे उघडण्यात आले होते. मुंबईतील पावसामुळे गेलाय दोन दिवसांत धरणातील जलसाठा तब्बल सव्वादोन लाख दशलक्ष लीटरने वाढला आहे. तुळशी, मोडकसागरबरोबरच सोमवारी सकाळी विहार तलावही भरून वाहिले. तसेच तलावातून मुंबईला दररोज ११० दशलक्ष लीटर जलसाठा पुरविण्या येतो. यंदा मुंबईकरांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा ‘रेल रोको’, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

Dahi Handi | कुर्ल्यामध्ये त्रिमूर्ती सेवा मंडळ गोविंदा पथकाने फोडली मानाची हंडी

News Desk

तरूणावर धारदार शस्त्राने वार करणारा गुन्हेगार अटक

News Desk