HW News Marathi
मुंबई

माहिती देण्यास टाळाटाळ, मुंबई विद्यापीठाला २५ हजार रुपयांचा दंड

मुंबई । मुंबई विद्यापीठाकडे माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणे महागात पडले आहे. मुंबई विद्यापीठाकडे २०१० ते २०१७ दरम्यानच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुंल्याकनासाठी घेण्यात आलेली रक्कम आणि होणारा खर्च याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी आकाश वेदक याने मागितली होती. मात्र, विद्यापीठाकडून ही माहिती न मिळाल्याने एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा माहिती मागविण्यासाठी आकाशने राज्य माहिती आयोगाकडे अपील केले.

तरीही मुंबई विद्यापीठाने माहिती दडवल्याने राज्य माहिती आयोगाने २५ हजार रुपयांचा दंड मुंबई विद्यापीठाला ठोठावला आहे. तसेच कुलगुरुंना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. मुंबई विद्यापीठ पुनर्मुंल्याकनासाठी कोट्यवधी रुपये विद्यार्थ्यांकडून घेते. मात्र पुनर्मुंल्याकन आणि फोटोकॉपीसाठी होणारा खर्च लाखांमध्ये आहे. मग बाकीचे पैसे कुठे जातात? असा प्रश्न अनेक विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

News Desk

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

News Desk

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अभ्यासवाटीकेची दुरावस्था

News Desk