HW News Marathi
मुंबई

प्रकाश आंबेडकरांच्या एल्गार मोर्चाला सुरुवात

मुंबई | भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणी संभाजी भिंडे यांना अटक करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘एल्गार मोर्चा’ काढला आहे. संभाजी भिडे यांना जावयासारखी वागणूक का देत आहेत?असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. तसेच रॅलीला परवानगी नाकारुन सरकार लोकशाहीचा गळा आवळत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे पोलिसांनी अटक केले आहे. पण, संभाजी भिंडे यांना अद्यापही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे.

पोलिसांनी परवानगी नाकराली

हा मोर्चा सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा जिजामाता उद्यान ते विधानभवन दरम्यान कढण्यात येणार होता. पण, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोर्चात सहभागी होणाऱ्यांना सीएसटी येथे जमण्यास सांगितले आहे. हा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला आहे.

पोलिसांचे आवाहन

परीक्षा सुरु असल्यामुळे रॅली काढू नका. वाहतुकीला अडथळा करु नका, असे आवाहन पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना केले आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. पण, रॅली काढण्यासा परवानगी दिली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्षांचा सत्कार समारंभ

swarit

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २० मिनिटे उशिराने

News Desk

नको त्या आवस्थेत पाहिल्यामुळे भावाने केला बहिणीचा खून

News Desk