HW News Marathi
मुंबई

प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत

मुंबईः एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा एकदा पोलीस सेवेत सामिल झाले आहेत. तब्बल दहा वर्षानंतर त्यांचे पोलीस दलात पुनरागमन झाले आहे. सध्या ते पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार स्वीकारतील. प्रदीप शर्मा हे काल पोलीस महासंचालकांना भेटण्यासाठी पोलीस मुख्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी कार्यभार स्वीकारला. शर्मा यांनी आतापर्यंत ३१२ एन्काउंटरमध्ये भाग घेतला असून त्यांनी १०० हून अधिक गुंडांचे एन्काउंटर केले आहे. त्यात अंडरवर्ल्डमधील गुंडांसहित लष्कर- ए-तोयबाच्या अतिरेक्यांनाचाही समावेश आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आणि डी. कंपनीच्या इशाऱ्यावर एन्काउंटर करत असल्याचा शर्मा यांच्यावर आरोप झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सोलापूर एक्सप्रेसला आग, दोन डबे जळून खाक

News Desk

कल्याण-मुरबाड मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील

News Desk

मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर दिवसाकालीन ब्लॉक रद्द

News Desk
देश / विदेश

जलप्रलयातही देशप्रेम अबाधित!

News Desk

गुवाहाटी : दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काल झालेले स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार कार्यक्रम आपण पाहिले. मात्र आसाममधील लहानशा शाळेसारखा सोहळा काल कुठेही झाला नसेल. पूरपरिस्थितीने वेढलेल्या आसाममध्ये चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन केले. जलप्रलयातही अबाधित राहिलेले हे देशप्रेम सध्या सोशल मिडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

आसाममधील ढुबरी जिल्ह्यात फकीरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नसकारा सरकारी शाळेतील हे छायाचित्र असून येथील सहायक शिक्षक मिजानूर रहमान यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर टाकल्यानंतर काही तासांतच ते तब्बल ६० हजार जणांनी शेअर केले. सोशल मिडियावर मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल रहमान यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने आसामसारख्या दुर्गम भागातील समस्यांना वाचा फुटल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘आम्हाला पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. वीजेची समस्याही मोठी आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आणि चार्ज करायला वीजही नव्हती. रस्ते आणि दळणवळणाच्या अन्य सुविधाही येथे आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत. याकडे शासनाने लक्ष पुरवावे,’ असे रहमान यांनी म्हटले आहे.

Related posts

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना २२ जानेवारीला फाशी

News Desk

“पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यात काय संबंध?”, राहुल गांधींनी जुना फोटो दाखवित केले सवाल

Aprna

दोन जजसमोर होणार ‘आप’च्या २० अपात्र आमदारांची पुढील सुनावणी

swarit