HW News Marathi
मुंबई

हिंमत असेल तर मध्यावधी निवडनुका घ्या- संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

मुंबई – शिवसेना नाईलाज म्हणून सत्तेत आहे. भाजप सरकार जनहीताचे काम करत नाही. जनते मध्ये प्रचंड नाराजी आहे. या सर्व बाबी पहाता हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणूका घेण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. ते पिपरी चिंचवड मध्ये बोलत होते.

भाजप बरोबर शिवसेनेचे टोकाचे मतभेद आहेत. जीएसटी, नोटबंदी, कर्जमाफीचा घोळ हे सरकारचे पाप आहे. त्यांच्या या पापात शिवसेनेला भागिदार व्हायचे नाही असेही ते म्हणाले. भाजपला जरी राऊत यांनी मध्यावधी घेण्याचे आव्हान दिले असले तरी सत्तेतून सेना बाहेर पडेल असे काही सांगितले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान जी २० विकास कार्यगटाच्या बैठकांचे आयोजन

Aprna

Dahi Handi | कुर्ल्यामध्ये त्रिमूर्ती सेवा मंडळ गोविंदा पथकाने फोडली मानाची हंडी

News Desk

मेट्रोचे खांब उभारण्याची मागणी न्यायालयाने नाकारली

Gauri Tilekar
महाराष्ट्र

हो.. घोडेबाजार तर होणारच…..अजित पवार 

News Desk

– शिवसेना भाजपच्या नितीवर अजितदादांचा प्रहार

मुंबई महापालिकेतील वर्चस्वासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. ही बाब अपेक्षितच होती. त्यामुळे मुंबई महापालिकेत आगामी काळातही घोडेबाजार हा होणारचं असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. भाजप आणि शिवसेनेत एका सदस्स्याचेच अंतर आहे. त्यात महापौर हा भाजपचाच होईल असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं मनसेचे ६ नगरसेवक फोडले. हीच बाब आता भाजपकडून होण्याची दाट शक्यताही पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळा घोडेबाजार आणि फोडाफोडीचेच राजकार मुंबई महापालिकेत पहायला मिळालं तर आश्चर्य नको असेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेनेवर पवार यांनी जोरदार टिका केली. भिती पोटी शिवसेना सत्ते आहे. सत्तेतून बाहेर पडले तर त्यांचे आमदार फुटण्याची भिती शिवसेनेला आहे. शिवसेनेची अवस्था “धरले तर चावते आणि सोडले तर पळते” अशी झाल्याचा टोला ही त्यांनी लगावला. नांदेड येथील निवडणुकीत शिवसेनेचा आमदार भाजपच्या मंचावर जाऊन प्रचार करतो. त्यांची तिकीटे वाटतो आणि आपल्याच पक्षाकडे पाठ फिरवतो. हे चित्र केविलवाणे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हयात असते तर आमदाराची अशी हिंमत झाली असती काय? असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Related posts

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? मुख्यमंत्री म्हणतात…

News Desk

दिशाहीन काँग्रेससोबत न जाता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार !

News Desk

आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही!, राज ठाकरेंचा इशारा

Aprna